शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

यंदाचे गणेश विसर्जन दणक्यात; ढोल-ताशा वादनावरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 05:36 IST

‘एनजीटी’ने ढोल-ताशा-झांज पथकांमध्ये ३० पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत, असे आदेश दिले होते, ‘एनजीटी’ने घातलेल्या निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

पुणे/नवी दिल्ली - गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीमध्ये आता कितीही ढोल-ताशा पथकांची संख्या असणार आहे. त्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परिणामी विसर्जन मिरवणुकीचा वेळ लांबण्याची शक्यता आहे. ढोल-ताशा वादनावरील निर्बंधांना स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे ढोल-ताशा पथकांनी स्वागत केले आहे.  तसेच, यंदाचे ढोल वादन चांगले होईल, अशी भावना गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केली आहे. 

पुण्याचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. गणेश विसर्जन मिरवणूक हा तर या उत्सवाचा परमोच्च बिंदू असतो. त्या मिरवणुकीत ढोल-ताशा वादन पाहणे हा एक अनुपम सोहळा असतो. परंतु, राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) एका निर्णयामुळे ढोल-ताशा पथकांच्या उत्साहाला मर्यादा आल्या होत्या. मात्र आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठा निर्णय घेऊन ढोल-ताशा पथकांना दिलासा दिला आहे.

‘एनजीटी’ने ढोल-ताशा-झांज पथकांमध्ये ३० पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत, असे आदेश दिले होते. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला, मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी सुनावणी झाली. तेव्हा एनजीटीचा मर्यादेवरील निर्णयाला स्थगिती दिली. परंतु, उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एनजीटीने जारी केलेल्या इतर निर्देशांना विरोध नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

एनजीटीचे हे होते आदेश

‘एनजीटी’ने ३० ऑगस्ट ढोल-ताशा पथकांबाबत निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते. या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विसर्जन मिरवणुकीदरम्यान रिअल टाईम ध्वनी प्रदूषण मोजावे.  पोलिसांनी ढोल-ताशा-झांज पथकात ३० पेक्षा जास्त सदस्य नसावेत, याची खात्री करावी. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलिसांनी साहित्य जप्त करावे, असेही आदेशात ‘एनजीटी’ने म्हटले होते.

मंडळांकडून स्वागत अन् पथकांमध्ये उत्साह

पुणे हे गणेशोत्सवाचे केंद्रबिंदू असल्याने इथे निर्बंध आणणे योग्य नव्हते. हरित लवादाने आमचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते. एकतर्फी निर्णय झाला होता. पण आता सरन्यायाधीशांनी स्थगिती दिल्याने सर्वांना दिलासा मिळाला. तरी ५ तारखेला सुनावणी असेल तेव्हा आम्ही म्हणणे मांडू.- पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा पथक महासंघ

आवाजाचे प्रदूषण डीजेमुळे होते. ढोल-ताशा हे पारंपरिक वाद्य आहेत. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे खूप गोंगाट किंवा प्रदूषण होत नाही. - कृणाल घारे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGaneshotsavगणेशोत्सव