शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

विरोधकांच्या इंडिया आघाडीला बळ, महाराष्ट्रातील १३ पक्षांचा पाठिंबा, राज्यातील समीकरणं बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 16:27 IST

Jayant Patil: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रामधील काँग्रेससह शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे सहभागी झालेले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढणार आहे. कारण महाराष्ट्रातील १३ पक्षांचा सहभाग असलेली प्रागतिक आघाडी इंडिया आघाडीसोबत असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर इंडिया आघाडीमधील सहभागाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, प्रागतिक आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये आहे आणि महाविकास आघाडी ही इंडिया आघाडीमध्ये आहे. त्यामुळे आम्हीही इंडिया आघाडीमध्ये आहोत. आम्ही इंडिया आघाडीमध्ये नाही आहोत, असं कुणीही म्हटलेलं नाही. तसं विधानही कुणीही केलेलं नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही प्रागतिक आघाडीमधील पक्ष एकत्रितपणे यांच्याशी बोलणार आहोत. एकेकट्याने बोलणार नाही. जे आमचे १३ पक्ष आहेत ते मिळून एकत्र बोलणार आणि जागा लढवण्याबाबत विचारविनिमय करणार. तसेच आम्हाला ज्या जागा मिळतील त्या आम्ही प्रागतिक आघाडी म्हणून लढवणार आहोत. मात्र जागेबाबत आम्ही कुठलेही मतभेद करणार नाही. तीच भूमिका शरद पवार यांनी आता मांडली आहे. जो निवडून येणार आहे तो उमेदवार, ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्याबाबत विचारविनिमय करून आपण तिकीट दिलं पाहिजे, अशी शरद पवार यांची भूमिक आहे. तीच भूमिका आमची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीIndiaभारत