शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
4
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
5
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
6
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
9
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
10
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
11
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
12
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
13
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
14
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
15
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
16
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
17
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
20
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 

बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 09:12 IST

मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली.

मुंबई - आज मी एकटा नाही तर असंख्य शिवसैनिक आहे. १९६७ साली शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर पहिली सत्ता ठाण्याने शिवसेनेला दिली. १९७४ मध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान निवडून आले. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना अशी ओळख झाली. आम्हाला जे काही मिळाले ते बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मिळाले. शिवसेना ही ४ अक्षरे काढली तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. लोकं पक्षप्रमुखांकडे बघून मतदान करतात तुम्हाला मते देत नाहीत. हे श्रेय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे आहे असं खासदार राजन विचारेंनी सांगितले.

खासदार राजन विचारे म्हणाले की,  उभ्या वादळात कसं उभं राहायचे हे धर्मवीर आनंद दिघेंमुळे शिकलो. मी जो काही आता उभा आहे तो त्यांच्या विचारानेच. ३१ वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतोय. ज्यावेळी ठाण्यात विकास सुरू झाला तेव्हा मी सभागृह नेता होतो. मी प्रत्येक आयुक्तांसोबत काम करत आलोय. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते यांना गल्ली ते दिल्ली जाण्याची संधी मिळाली ती दिघेंमुळे. टीमवर्क म्हणून तेव्हा काम करायला लागायचे. मी महापौर असताना रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी ७ वाजता ३०-३२ पेपर घेऊन बसायला लागायचे. जर टॉवरवरील घड्याळाचे काटे बंद आहेत. तर त्यालाही उत्तर द्यायला लागायचे. ९.३० सुमारास बाळासाहेब ठाकरेंचा फोन यायचा. शहरातील प्रत्येक विषयाकडे बारकाईने लक्ष असायचे. त्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते इथपर्यंत येऊन पोहचलेत असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय २४ तासांतील १६ तास मी आनंद दिघेंसोबत असायचो. कॉलेजसुद्धा अर्धवट सोडलं. माझे वडील शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये कामाला होते. कपबशा धुवून शिक्षण घेत पदवीधर झाले होते. ब्रिटीश कंपनीत ३-४ मराठी अधिकारी होते त्यात माझे बाबा होते. शिवसेना विचाराने आम्ही प्रेरित झालो होतो. ४ दिवस घरी यायचो नाही. मुरबाड, पालघर, वाडा, जव्हार याठिकाणी जायचो. दिघेंसोबत जात असल्याने आई वडिलांना विश्वास होता. नंदकुमार शेडगे, विनोद सावे असे सहकारी असायचे. मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली.

दरम्यान, शिवसैनिकांची घरे तोडली, उद्योगधंदे बंद केलेत. शाखा तोडल्या. महिला बचत गटाच्या झुणका भाकर केंद्रे बंद केली. अख्खी पोलीस यंत्रणा तुम्ही या कामाला लावलेत. अनेकांचे पोलीस संरक्षण काढून टाकलंय. हे गद्दारी करून सरकारमध्ये बसलेत. हे जास्त दिवस टिकणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे पण हे न करता गेल्या वर्षभरात केवळ एकच गुन्हा दाखल झाला. भरदिवसा महाराष्ट्रात कोयत्याने वार करतायेत मग पोलीस काय करतायेत असं खासदार राजन विचारेंनी खडसावलं.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना