शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 09:12 IST

मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली.

मुंबई - आज मी एकटा नाही तर असंख्य शिवसैनिक आहे. १९६७ साली शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर पहिली सत्ता ठाण्याने शिवसेनेला दिली. १९७४ मध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान निवडून आले. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना अशी ओळख झाली. आम्हाला जे काही मिळाले ते बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मिळाले. शिवसेना ही ४ अक्षरे काढली तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. लोकं पक्षप्रमुखांकडे बघून मतदान करतात तुम्हाला मते देत नाहीत. हे श्रेय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे आहे असं खासदार राजन विचारेंनी सांगितले.

खासदार राजन विचारे म्हणाले की,  उभ्या वादळात कसं उभं राहायचे हे धर्मवीर आनंद दिघेंमुळे शिकलो. मी जो काही आता उभा आहे तो त्यांच्या विचारानेच. ३१ वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतोय. ज्यावेळी ठाण्यात विकास सुरू झाला तेव्हा मी सभागृह नेता होतो. मी प्रत्येक आयुक्तांसोबत काम करत आलोय. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते यांना गल्ली ते दिल्ली जाण्याची संधी मिळाली ती दिघेंमुळे. टीमवर्क म्हणून तेव्हा काम करायला लागायचे. मी महापौर असताना रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी ७ वाजता ३०-३२ पेपर घेऊन बसायला लागायचे. जर टॉवरवरील घड्याळाचे काटे बंद आहेत. तर त्यालाही उत्तर द्यायला लागायचे. ९.३० सुमारास बाळासाहेब ठाकरेंचा फोन यायचा. शहरातील प्रत्येक विषयाकडे बारकाईने लक्ष असायचे. त्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते इथपर्यंत येऊन पोहचलेत असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय २४ तासांतील १६ तास मी आनंद दिघेंसोबत असायचो. कॉलेजसुद्धा अर्धवट सोडलं. माझे वडील शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये कामाला होते. कपबशा धुवून शिक्षण घेत पदवीधर झाले होते. ब्रिटीश कंपनीत ३-४ मराठी अधिकारी होते त्यात माझे बाबा होते. शिवसेना विचाराने आम्ही प्रेरित झालो होतो. ४ दिवस घरी यायचो नाही. मुरबाड, पालघर, वाडा, जव्हार याठिकाणी जायचो. दिघेंसोबत जात असल्याने आई वडिलांना विश्वास होता. नंदकुमार शेडगे, विनोद सावे असे सहकारी असायचे. मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली.

दरम्यान, शिवसैनिकांची घरे तोडली, उद्योगधंदे बंद केलेत. शाखा तोडल्या. महिला बचत गटाच्या झुणका भाकर केंद्रे बंद केली. अख्खी पोलीस यंत्रणा तुम्ही या कामाला लावलेत. अनेकांचे पोलीस संरक्षण काढून टाकलंय. हे गद्दारी करून सरकारमध्ये बसलेत. हे जास्त दिवस टिकणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे पण हे न करता गेल्या वर्षभरात केवळ एकच गुन्हा दाखल झाला. भरदिवसा महाराष्ट्रात कोयत्याने वार करतायेत मग पोलीस काय करतायेत असं खासदार राजन विचारेंनी खडसावलं.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना