शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 09:12 IST

मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली.

मुंबई - आज मी एकटा नाही तर असंख्य शिवसैनिक आहे. १९६७ साली शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर पहिली सत्ता ठाण्याने शिवसेनेला दिली. १९७४ मध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान निवडून आले. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना अशी ओळख झाली. आम्हाला जे काही मिळाले ते बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मिळाले. शिवसेना ही ४ अक्षरे काढली तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. लोकं पक्षप्रमुखांकडे बघून मतदान करतात तुम्हाला मते देत नाहीत. हे श्रेय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे आहे असं खासदार राजन विचारेंनी सांगितले.

खासदार राजन विचारे म्हणाले की,  उभ्या वादळात कसं उभं राहायचे हे धर्मवीर आनंद दिघेंमुळे शिकलो. मी जो काही आता उभा आहे तो त्यांच्या विचारानेच. ३१ वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतोय. ज्यावेळी ठाण्यात विकास सुरू झाला तेव्हा मी सभागृह नेता होतो. मी प्रत्येक आयुक्तांसोबत काम करत आलोय. आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते यांना गल्ली ते दिल्ली जाण्याची संधी मिळाली ती दिघेंमुळे. टीमवर्क म्हणून तेव्हा काम करायला लागायचे. मी महापौर असताना रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी ७ वाजता ३०-३२ पेपर घेऊन बसायला लागायचे. जर टॉवरवरील घड्याळाचे काटे बंद आहेत. तर त्यालाही उत्तर द्यायला लागायचे. ९.३० सुमारास बाळासाहेब ठाकरेंचा फोन यायचा. शहरातील प्रत्येक विषयाकडे बारकाईने लक्ष असायचे. त्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते इथपर्यंत येऊन पोहचलेत असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय २४ तासांतील १६ तास मी आनंद दिघेंसोबत असायचो. कॉलेजसुद्धा अर्धवट सोडलं. माझे वडील शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये कामाला होते. कपबशा धुवून शिक्षण घेत पदवीधर झाले होते. ब्रिटीश कंपनीत ३-४ मराठी अधिकारी होते त्यात माझे बाबा होते. शिवसेना विचाराने आम्ही प्रेरित झालो होतो. ४ दिवस घरी यायचो नाही. मुरबाड, पालघर, वाडा, जव्हार याठिकाणी जायचो. दिघेंसोबत जात असल्याने आई वडिलांना विश्वास होता. नंदकुमार शेडगे, विनोद सावे असे सहकारी असायचे. मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली.

दरम्यान, शिवसैनिकांची घरे तोडली, उद्योगधंदे बंद केलेत. शाखा तोडल्या. महिला बचत गटाच्या झुणका भाकर केंद्रे बंद केली. अख्खी पोलीस यंत्रणा तुम्ही या कामाला लावलेत. अनेकांचे पोलीस संरक्षण काढून टाकलंय. हे गद्दारी करून सरकारमध्ये बसलेत. हे जास्त दिवस टिकणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे पण हे न करता गेल्या वर्षभरात केवळ एकच गुन्हा दाखल झाला. भरदिवसा महाराष्ट्रात कोयत्याने वार करतायेत मग पोलीस काय करतायेत असं खासदार राजन विचारेंनी खडसावलं.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना