शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
4
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
5
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
6
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
7
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
8
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
9
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
10
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
11
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
12
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
13
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
14
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
15
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
16
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
17
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
19
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
20
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारवर कंत्राटदारांचे ८९ हजार कोटी रूपये थकीत

By आनंद डेकाटे | Updated: July 4, 2025 18:59 IST

५७,५०९ कोटींची पुरवणी मागणी सादर : राज्याची आर्थिक स्थिती संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५७,५०९.७१ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या, मात्र याच वेळी कंत्राटदारांचे तब्बल ८९ हजार कोटी रूपये थकीत असल्याची बाब समोर आली आहे. ही थकबाकी राज्याच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीचा आरसाच ठरत आहे. कंत्राटदार आंदोलनाच्या तयारीत असून याचा थेट परिणाम राज्यातील विकासकामांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंगळवारी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी कंत्राटदार संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या थकीत बिलांचा तात्काळ निकाल लावण्याची मागणी केली. नागपूरमध्येहीमहाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना निवेदन सादर केले.

या निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्रात कंत्राटदार, शिक्षित बेरोजगार अभियंते, मजूर संस्था आणि विकासकांनी सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, नगर विकास, जलसंधारण, जलसंपदा आणि जलजीवन मिशन यांसारख्या विभागांतर्गत सुमारे ८९ हजार कोटींची कामे केली आहेत. मात्र गेल्या १० महिन्यांपासून त्यांचे बिलांचे पैसे दिले गेलेले नाहीत, ज्यामुळे देयकांची रक्कम थेट ८९ हजार कोटी रूपयांवर पोहचली आहे. कंत्राटदारांच्या शिष्टमंडळात सुबोध सरोदे, संजय मैंद, पराग मुंजे, अतुल कलोटी, नरेश खुमकर, रूपेश रणदिवे, कौशिक देशमुख, विपिन बंसोड, विनय सहारे, दिनेश कोपुलवार, अभिषेक गुप्ता, दिनेश मंत्र, अनिल शंभरकर आदींचा समावेश होता. 

आंदोलनाचेही परिणाम शून्यकंत्राटदारांचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षभरापासून त्यांनी आंदोलन केले. धरणे, उपोषण, मोर्चे आणि मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना आपली व्यथा सांगितली, तरीही काहीही परिणाम झाला नाही. मार्च महिन्यात केवळ १० टक्के रक्कम वितरित करण्यात आली, तीही निवडक कंत्राटदारांना देण्यात आली. आता अनेक कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विकासकामांसाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्ताही भरता येत नाहीत. 

कोणत्या विभागावर किती थकबाकी?विभाग थकबाकीची रक्कम

  • सार्वजनिक बांधकाम विभाग - ४०,००० कोटी
  • जलजीवन मिशन - १२,००० कोटी
  • ग्रामीण विकास विभाग - ६,००० कोटी
  • जलसंधारण व जलसंपदा - १३,००० कोटी
  • नगर विकास विभाग - १८,००० कोटी

 

पैसा नेमका जातोय कुठे?कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे बिल रोखून सरकार लोकप्रिय योजना राबवण्यावर भर देत आहे. लाडकी बहिण योजना अंतर्गत राज्यातील सुमारे २.५ कोटी महिलांना दरमहा १५०० डीबीटीच्या माध्यमातून दिले जात आहेत. या योजनेवर दरमहा ३६०० कोटी खर्च होतो. १२ महिने पूर्ण झाल्यानंतर आता या रकमेच्या वाढीचा विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० दिले जात आहेत. तसेच कृषिपंपासाठी मोफत वीजही दिली जाते. या सर्व योजनांच्या खर्चामुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध नसल्याचा ठपका कंत्राटदारांनी सरकारवर ठेवला आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस