शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळताना सर्वात आधी पाहणाऱ्यानं सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:32 IST

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यापासून गावचं चित्र कसं बदललं, स्थानिकांनी सांगितले. 

मालवण - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली तर विरोधकांनी या मुद्द्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला. नेमका हा पुतळा कसा कोसळला याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली आहे. मात्र पुतळा कोसळताना सर्वात आधी पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने ती धक्कादायक घटना नेमकी कशी घडली ते सांगितले आहे.

मालवणमधील स्थानिक मच्छिमार असलेले सुनील खंदारे म्हणाले की, दुपारी १.१८ मिनिटांनी वारा आणि पाऊस आला तेव्हा तो पुतळा कोसळला. आम्ही ते डोळ्याने पाहिले. मी बाजारातून येत होतो. त्यानंतर मी घरी येऊन मी कोल्हे साहेबांना फोन लावला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमिनीवर पडला असं सांगितले. त्यानंतर ते घटनास्थळी आले. आम्हीही तिथे गेलो. अस्थव्यस्थ पुतळा पाहून भावना सोसवत नव्हत्या इतकं जीवाला लागलं. आम्ही ताबडबोड ताडपत्री घेऊन जात तिथे पुतळा झाकून घेतला. त्यानंतर कुडाळहून अधिकारी आले. त्यानंतर बाकी सर्व झालं असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय वाऱ्याच्या वेगाने पुतळा कोसळला म्हणण्यापेक्षा तो बसवल्यापासून समतोल नव्हता. त्याचे वजन होते, त्यामुळे खालचे वेल्डिंग मोडून तो पुतळा कोसळला आहे. दररोज आम्ही येता जाता तो पुतळा बघायचो. तो आता दिसत नाही. या घटनेनंतर आपल्या घरातीलच सदस्य गेला अशा भावना आल्या. आमच्या जीवाला खूप लागलं. याठिकाणी मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं होते. तेव्हापासून पर्यटन वाढले होते. स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार मिळाला. राजकोटचं परिवर्तन झालं होते. जगाच्या पाठीवर राजकोटचं नाव उमटलं असंही सुनील खंदारे यांनी म्हटलं.

दरम्यान, मालवण समुद्रकिनारी खारे वातावरण असल्याने बाहेर जे लोखंड २ वर्ष टिकते ते इथं ३ महिन्यात गंजून पडणार. लोखंड टिकू शकत नाही. एवढा खर्च करून पुतळा ब्राँझचा बनवला परंतु त्याला सपोर्टला लोखंडाचे वेल्डिंग केले. इलेक्ट्रिक पोल वापरतात ते लोखंड होते. त्यामुळे हे वेल्डिंग ८ महिन्यातच सडून गेले. त्यामुळे पुतळा कोसळला. पुतळ्याचे वरचे वजन किती आणि त्याला खालचा बेस किती असला पाहिजे हे तज्ज्ञांना कळेल. त्यामुळे घाई करून पुतळा बांधला तर पुन्हा असं घडू शकतं. त्यामुळे शासनाने जरी वेळ झाला तरी यावर राजकारण होऊ नये असंही सुनील खंदारे यांनी सांगितले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMalvan beachमालवण समुद्र किनाराEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार