शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळताना सर्वात आधी पाहणाऱ्यानं सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:32 IST

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यापासून गावचं चित्र कसं बदललं, स्थानिकांनी सांगितले. 

मालवण - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली तर विरोधकांनी या मुद्द्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला. नेमका हा पुतळा कसा कोसळला याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली आहे. मात्र पुतळा कोसळताना सर्वात आधी पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने ती धक्कादायक घटना नेमकी कशी घडली ते सांगितले आहे.

मालवणमधील स्थानिक मच्छिमार असलेले सुनील खंदारे म्हणाले की, दुपारी १.१८ मिनिटांनी वारा आणि पाऊस आला तेव्हा तो पुतळा कोसळला. आम्ही ते डोळ्याने पाहिले. मी बाजारातून येत होतो. त्यानंतर मी घरी येऊन मी कोल्हे साहेबांना फोन लावला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमिनीवर पडला असं सांगितले. त्यानंतर ते घटनास्थळी आले. आम्हीही तिथे गेलो. अस्थव्यस्थ पुतळा पाहून भावना सोसवत नव्हत्या इतकं जीवाला लागलं. आम्ही ताबडबोड ताडपत्री घेऊन जात तिथे पुतळा झाकून घेतला. त्यानंतर कुडाळहून अधिकारी आले. त्यानंतर बाकी सर्व झालं असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय वाऱ्याच्या वेगाने पुतळा कोसळला म्हणण्यापेक्षा तो बसवल्यापासून समतोल नव्हता. त्याचे वजन होते, त्यामुळे खालचे वेल्डिंग मोडून तो पुतळा कोसळला आहे. दररोज आम्ही येता जाता तो पुतळा बघायचो. तो आता दिसत नाही. या घटनेनंतर आपल्या घरातीलच सदस्य गेला अशा भावना आल्या. आमच्या जीवाला खूप लागलं. याठिकाणी मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं होते. तेव्हापासून पर्यटन वाढले होते. स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार मिळाला. राजकोटचं परिवर्तन झालं होते. जगाच्या पाठीवर राजकोटचं नाव उमटलं असंही सुनील खंदारे यांनी म्हटलं.

दरम्यान, मालवण समुद्रकिनारी खारे वातावरण असल्याने बाहेर जे लोखंड २ वर्ष टिकते ते इथं ३ महिन्यात गंजून पडणार. लोखंड टिकू शकत नाही. एवढा खर्च करून पुतळा ब्राँझचा बनवला परंतु त्याला सपोर्टला लोखंडाचे वेल्डिंग केले. इलेक्ट्रिक पोल वापरतात ते लोखंड होते. त्यामुळे हे वेल्डिंग ८ महिन्यातच सडून गेले. त्यामुळे पुतळा कोसळला. पुतळ्याचे वरचे वजन किती आणि त्याला खालचा बेस किती असला पाहिजे हे तज्ज्ञांना कळेल. त्यामुळे घाई करून पुतळा बांधला तर पुन्हा असं घडू शकतं. त्यामुळे शासनाने जरी वेळ झाला तरी यावर राजकारण होऊ नये असंही सुनील खंदारे यांनी सांगितले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMalvan beachमालवण समुद्र किनाराEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार