शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळताना सर्वात आधी पाहणाऱ्यानं सांगितला धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:32 IST

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यापासून गावचं चित्र कसं बदललं, स्थानिकांनी सांगितले. 

मालवण - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली तर विरोधकांनी या मुद्द्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला. नेमका हा पुतळा कसा कोसळला याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली आहे. मात्र पुतळा कोसळताना सर्वात आधी पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने ती धक्कादायक घटना नेमकी कशी घडली ते सांगितले आहे.

मालवणमधील स्थानिक मच्छिमार असलेले सुनील खंदारे म्हणाले की, दुपारी १.१८ मिनिटांनी वारा आणि पाऊस आला तेव्हा तो पुतळा कोसळला. आम्ही ते डोळ्याने पाहिले. मी बाजारातून येत होतो. त्यानंतर मी घरी येऊन मी कोल्हे साहेबांना फोन लावला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमिनीवर पडला असं सांगितले. त्यानंतर ते घटनास्थळी आले. आम्हीही तिथे गेलो. अस्थव्यस्थ पुतळा पाहून भावना सोसवत नव्हत्या इतकं जीवाला लागलं. आम्ही ताबडबोड ताडपत्री घेऊन जात तिथे पुतळा झाकून घेतला. त्यानंतर कुडाळहून अधिकारी आले. त्यानंतर बाकी सर्व झालं असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय वाऱ्याच्या वेगाने पुतळा कोसळला म्हणण्यापेक्षा तो बसवल्यापासून समतोल नव्हता. त्याचे वजन होते, त्यामुळे खालचे वेल्डिंग मोडून तो पुतळा कोसळला आहे. दररोज आम्ही येता जाता तो पुतळा बघायचो. तो आता दिसत नाही. या घटनेनंतर आपल्या घरातीलच सदस्य गेला अशा भावना आल्या. आमच्या जीवाला खूप लागलं. याठिकाणी मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं होते. तेव्हापासून पर्यटन वाढले होते. स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार मिळाला. राजकोटचं परिवर्तन झालं होते. जगाच्या पाठीवर राजकोटचं नाव उमटलं असंही सुनील खंदारे यांनी म्हटलं.

दरम्यान, मालवण समुद्रकिनारी खारे वातावरण असल्याने बाहेर जे लोखंड २ वर्ष टिकते ते इथं ३ महिन्यात गंजून पडणार. लोखंड टिकू शकत नाही. एवढा खर्च करून पुतळा ब्राँझचा बनवला परंतु त्याला सपोर्टला लोखंडाचे वेल्डिंग केले. इलेक्ट्रिक पोल वापरतात ते लोखंड होते. त्यामुळे हे वेल्डिंग ८ महिन्यातच सडून गेले. त्यामुळे पुतळा कोसळला. पुतळ्याचे वरचे वजन किती आणि त्याला खालचा बेस किती असला पाहिजे हे तज्ज्ञांना कळेल. त्यामुळे घाई करून पुतळा बांधला तर पुन्हा असं घडू शकतं. त्यामुळे शासनाने जरी वेळ झाला तरी यावर राजकारण होऊ नये असंही सुनील खंदारे यांनी सांगितले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMalvan beachमालवण समुद्र किनाराEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार