शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
3
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
4
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
5
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
6
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
7
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
8
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
9
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
10
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
11
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
12
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
13
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
14
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
15
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
16
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
17
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
18
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
19
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
20
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा

"जातीय राजकारणाचा पाया रचणाऱ्यांची राजवट आज धुळीला मिळत आहे..."- सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 18:04 IST

...ते सर्व चक्रव्यूह तोडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवाची बाजी लावली. खरे तर ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो. त्या लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत आम्हा दोघांना (सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर) अधिक आहे."

विधानसभा निवडणुकीत महायुतीला अतिप्रचंड यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. तत्पूर्वी, आज पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यानंतर आता सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थाने धुळीला मिळत आहे -सदाभाऊ म्हणाले. "महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा तारणहार, शेतकऱ्यांचा योद्धा, जलनायक, बहुजनांना बरोबर घेऊन जाणारा आणि खेड्यापाड्यातील जनतेला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आता मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभत आहे." यावेळी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधताना सदाभाऊ म्हणाले, "ज्याने या महाराष्ट्रात जातीय राजकाराणाचा पाया रचला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थाने धुळीला मिळत आहे. ती राजवट आज त्यांच्या डोळ्यासमोर, रावणाची सोन्याची लंका जळावी, तशी जळायला लागली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे." तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राम राज्याला सुरुवात  होत आहे. याचा आनंद मला आणि गावगाड्यातील प्रत्येक माणसाला आहे," असेही सदाभाऊ यावेळी म्हणाले.

'त्या' लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत... -"सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, "खरे तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे शिपाई अथवा सैनिक म्हणून मैदानात लढत होतो. जसे अभिमंन्यूला चक्रव्यूहात अडकवले गेले, तेसेच अनेक चक्रव्यूह देवेंद्र फडणवीस यांच्या बोवती तयार करण्यात आलेले होते. ते सर्व चक्रव्यूह तोडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवाची बाजी लावली. खरे तर ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो. त्या लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत आम्हा दोघांना (सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर) अधिक आहे."

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा