शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

धक्कादायक! राज्यात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक, उस्मानाबाद आणि औरंगाबाद आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 10:43 IST

Child Marriage: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, २०१९-२० या वर्षात १८ वर्षांखालील मुलींच्या लग्नाचे प्रमाण राज्यात २१.९ टक्के, तर २१ वर्षांखालील मुलांच्या लग्नाचे प्रमाण १०.५ टक्के असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, २०१९-२० या वर्षात १८ वर्षांखालील मुलींच्या लग्नाचे प्रमाण राज्यात २१.९ टक्के, तर २१ वर्षांखालील मुलांच्या लग्नाचे प्रमाण १०.५ टक्के असल्याचे समोर आले आहे. देशात हे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असून, मुलींच्या बालविवाहाचे प्रमाण २३.३ टक्के, तर मुलांच्या बालविवाहाचे प्रमाण १७.७ टक्के आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार राज्यात उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, नंदुरबार, पुण्यात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. कुटुंब आरोग्य सर्वेक्षण चारशी तुलना करता ही आकडेवारी कमी असली तरी त्याचे या मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम गंभीर असल्याची माहिती आरोग्यतज्ज्ञही देत आहेत. 

लॉकडाउनमध्ये बालविवाहाचे प्रमाणलॉकडाउनमुळे कुटुंबासमोरील उदरनिर्वाहाचा प्रश्न, गरिबी, शाळा-महाविद्यालये बंद असल्याने घरात एकटीच असलेल्या मुलीची चिंता, लॉकडाउन काळात विवाहाच्या खर्चात होणारी बचत, मुलीसाठी आलेले चांगले स्थळ आदी कारणांमुळे पालक मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विवाह लावून देत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देत आहेत. यामध्ये ही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे.राज्य सरकारमार्फत क्राय (चाइल्ड राइट्स) ही संस्था मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात, पाड्यात अंगणवाडीसेविका, आशासेविका यांच्यासह पोलीसपाटील यांच्यासोबत काम करून बालविवाह थांबविण्याचा प्रयत्न करत आहे. 

बालविवाहाचे प्रमाणराज्य  शहरी     ग्रामीण     एकूण मुली     १५.७       २७.६    २१.९ मुले     ९.६       ११.३     १०.५ देश     शहरी   ग्रामीण   एकूण मुली     १४.७   २७       २३.३ मुले     ११.३   २१.१      १७.७ राज्यातील स्थिती (राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ - २०२०- २१)जिल्हा     प्रमाण अहमदनगर    २६.९ औरंगाबाद     ३५.८गडचिरोली     १०.१लातूर    ३१मुंबई    ४.५ नंदुरबार     २४उस्मानाबाद    ३६.६ पुणे    २४वर्धा     ९

टॅग्स :marriageलग्नMaharashtraमहाराष्ट्र