शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

विद्यापीठांच्या स्वायत्ततेला लागणार चाप; सरकारचे सुतोवाच, अतिरेक होत असल्याने राज्यपालांना काही अधिकार देणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 11:19 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्यांद्वारे विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकऱ्या मिळविल्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी मूळ प्रश्न विचारला होता. डॉ. नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, विकास ठाकरे या सदस्यांनी उपप्रश्न विचारले.

मुंबई : राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून विद्यापीठांना स्वायत्तता दिली. पण आता त्याचा अतिरेक होत असल्याने काहीएक नियंत्रण आवश्यक असल्याचे राज्य सरकारचे मत असून विद्यापीठांमधील चौकशी आदींसंदर्भात राज्यपालांना काही अधिकार दिले जातील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. 

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्यांद्वारे विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकऱ्या मिळविल्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी मूळ प्रश्न विचारला होता. डॉ. नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, विकास ठाकरे या सदस्यांनी उपप्रश्न विचारले. इराकच्या दूतावासामार्फत २७ विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला पत्र प्राप्त झाले होते. हे इराकमधील विद्यार्थी आहेत आणि बोगस पदव्यांप्रकरणी त्या देशात या विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. इराकचे काही विद्यार्थी १४ जून २०२३ रोजी नागपुरात आले होते. या २७ विद्यार्थ्यांची विद्यापीठात नोंदणीच नव्हती. त्यांना दिलेली प्रमाणपत्रे ही विद्यापीठाने जारी केलेली नाहीत. या संपूर्ण प्रकरणाची विस्ताराने माहिती नागपुरातील अंबाझरी पोलिस ठाणे, इराकचा दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयालादेखील विद्यापीठाने दिली आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

 या निमित्ताने या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या एका सदस्यावर झालेला अन्याय, चौकशी होऊनही न झालेली कारवाई याकडे नितीन राऊत यांनी लक्ष वेधले. विकास ठाकरे यांनी विद्यापीठात एकेकाळी गाजलेल्या पदवी घोटाळ्याचा उल्लेख केला. 

कायद्यात सुधारणा करणार विद्यापीठाच्या कारभाराबाबतच्या तक्रारींचा धागा पकडून चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारने २०१७ मध्ये विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून विविध प्रकारची स्वायत्तता विद्यापीठांना दिली होती. मात्र, काही बाबतीत आता अतिरेक होत आहे. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंसंदर्भात चौकशीची भूमिका उच्च शिक्षण विभागाने घेतली. त्यावर, त्या कुलगुरू उच्च न्यायालयात गेल्या आणि उच्च न्यायालयाने सरकारलाच फटकारले होते. त्यामुळे चौकशांसारख्या विषयात राज्य सरकार वा विशेषत:  कुलपती म्हणून राज्यपालांना काही अधिकार असले पाहिजेत, या भूमिकेप्रत राज्य सरकार आले असून लवकरच तशी सुधारणा कायद्यात केली जाईल.

टॅग्स :universityविद्यापीठMaharashtraमहाराष्ट्रchandrakant patilचंद्रकांत पाटीलEducationशिक्षण