शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विद्यापीठांच्या स्वायत्ततेला लागणार चाप; सरकारचे सुतोवाच, अतिरेक होत असल्याने राज्यपालांना काही अधिकार देणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 11:19 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्यांद्वारे विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकऱ्या मिळविल्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी मूळ प्रश्न विचारला होता. डॉ. नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, विकास ठाकरे या सदस्यांनी उपप्रश्न विचारले.

मुंबई : राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून विद्यापीठांना स्वायत्तता दिली. पण आता त्याचा अतिरेक होत असल्याने काहीएक नियंत्रण आवश्यक असल्याचे राज्य सरकारचे मत असून विद्यापीठांमधील चौकशी आदींसंदर्भात राज्यपालांना काही अधिकार दिले जातील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. 

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बोगस पदव्यांद्वारे विद्यार्थ्यांनी इराकमध्ये नोकऱ्या मिळविल्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी मूळ प्रश्न विचारला होता. डॉ. नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, विकास ठाकरे या सदस्यांनी उपप्रश्न विचारले. इराकच्या दूतावासामार्फत २७ विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला पत्र प्राप्त झाले होते. हे इराकमधील विद्यार्थी आहेत आणि बोगस पदव्यांप्रकरणी त्या देशात या विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. इराकचे काही विद्यार्थी १४ जून २०२३ रोजी नागपुरात आले होते. या २७ विद्यार्थ्यांची विद्यापीठात नोंदणीच नव्हती. त्यांना दिलेली प्रमाणपत्रे ही विद्यापीठाने जारी केलेली नाहीत. या संपूर्ण प्रकरणाची विस्ताराने माहिती नागपुरातील अंबाझरी पोलिस ठाणे, इराकचा दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयालादेखील विद्यापीठाने दिली आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 

 या निमित्ताने या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या एका सदस्यावर झालेला अन्याय, चौकशी होऊनही न झालेली कारवाई याकडे नितीन राऊत यांनी लक्ष वेधले. विकास ठाकरे यांनी विद्यापीठात एकेकाळी गाजलेल्या पदवी घोटाळ्याचा उल्लेख केला. 

कायद्यात सुधारणा करणार विद्यापीठाच्या कारभाराबाबतच्या तक्रारींचा धागा पकडून चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य सरकारने २०१७ मध्ये विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून विविध प्रकारची स्वायत्तता विद्यापीठांना दिली होती. मात्र, काही बाबतीत आता अतिरेक होत आहे. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंसंदर्भात चौकशीची भूमिका उच्च शिक्षण विभागाने घेतली. त्यावर, त्या कुलगुरू उच्च न्यायालयात गेल्या आणि उच्च न्यायालयाने सरकारलाच फटकारले होते. त्यामुळे चौकशांसारख्या विषयात राज्य सरकार वा विशेषत:  कुलपती म्हणून राज्यपालांना काही अधिकार असले पाहिजेत, या भूमिकेप्रत राज्य सरकार आले असून लवकरच तशी सुधारणा कायद्यात केली जाईल.

टॅग्स :universityविद्यापीठMaharashtraमहाराष्ट्रchandrakant patilचंद्रकांत पाटीलEducationशिक्षण