शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:43 IST

Nitin Gadkari on Indian Economy: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील गरीब आणि श्रीमंतामधील वाढत्या दरीबद्दल चिंता व्यक्त केली. 

Nitin Gadkari News: देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत्या दरीबद्दल केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. हळूहळू देशात गरीब वाढत चालले आहेत आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती चालली आहे, अशी चिंता नितीन गडकरी व्यक्त केली. अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होता कामा नये. संपत्तीचेही विकेंद्रीकरण व्हायला हवे, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपूरमध्ये सीए विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी देशाची अर्थव्यवस्था, संपत्तीचे मोजक्या श्रीमंताकडे होत असलेले केंद्रीकरण या मुद्द्यांवरही बोट ठेवले. 

नितीन गडकरी गरीब-श्रीमंत दरीबद्दल काय बोलले?

कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, "आता लोक हा प्रश्न विचारत आहे की, आपल्या विकासासाठी आर्थिक चिंतनाची गरज आहे. अमेरिकेने उदारमतवादी अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले. पण, ते मॉडेलही अयशस्वी ठरले आहे. आपल्या देशातही ही चर्चा आहे की, आपण काय करायला हवे?"

"आपले उद्दिष्ट हे आहे की, गरिबांची गरिबी दूर करणारा, तरुणांना रोजगार निर्मिती करणारा, देशाची संपत्ती वाढवणारा आर्थिक पर्याय आपल्याला हवा आहे. त्यामुळे साहजिकच नरसिंहराव आणि मनमोहन सिंगजी यांनी उदारमतवादी अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारले. हे स्वीकारले, पण आपल्याला विचार करावा लागेल की, अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होता कामा नये", अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली. 

गरिबांची संख्या वाढतेय -नितीन गडकरी

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, "हळूहळू गरीब वाढत चालले आहेत आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होत चालले आहे. हे होता कामा नये. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायला हवे, संपत्तीचेही विकेंद्रीकरण व्हायला हवे. आर्थिक स्थितीमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत, त्यात सीएची भूमिका खूप महत्त्वाची आहे."

भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, "जीडीपीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान समान नाहीये. जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा २२ ते २४ टक्के आहे. सेवा क्षेत्राचा ५२ ते ५४ टक्के, तर कृषि क्षेत्राचा वाटा फक्त १२ टक्के आहे. यात ६५ ते ७० टक्के ग्रामीण लोकसंख्या आहे."

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरEconomyअर्थव्यवस्था