शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:43 IST

Nitin Gadkari on Indian Economy: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील गरीब आणि श्रीमंतामधील वाढत्या दरीबद्दल चिंता व्यक्त केली. 

Nitin Gadkari News: देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत्या दरीबद्दल केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. हळूहळू देशात गरीब वाढत चालले आहेत आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती चालली आहे, अशी चिंता नितीन गडकरी व्यक्त केली. अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होता कामा नये. संपत्तीचेही विकेंद्रीकरण व्हायला हवे, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपूरमध्ये सीए विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी देशाची अर्थव्यवस्था, संपत्तीचे मोजक्या श्रीमंताकडे होत असलेले केंद्रीकरण या मुद्द्यांवरही बोट ठेवले. 

नितीन गडकरी गरीब-श्रीमंत दरीबद्दल काय बोलले?

कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, "आता लोक हा प्रश्न विचारत आहे की, आपल्या विकासासाठी आर्थिक चिंतनाची गरज आहे. अमेरिकेने उदारमतवादी अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले. पण, ते मॉडेलही अयशस्वी ठरले आहे. आपल्या देशातही ही चर्चा आहे की, आपण काय करायला हवे?"

"आपले उद्दिष्ट हे आहे की, गरिबांची गरिबी दूर करणारा, तरुणांना रोजगार निर्मिती करणारा, देशाची संपत्ती वाढवणारा आर्थिक पर्याय आपल्याला हवा आहे. त्यामुळे साहजिकच नरसिंहराव आणि मनमोहन सिंगजी यांनी उदारमतवादी अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारले. हे स्वीकारले, पण आपल्याला विचार करावा लागेल की, अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होता कामा नये", अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली. 

गरिबांची संख्या वाढतेय -नितीन गडकरी

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, "हळूहळू गरीब वाढत चालले आहेत आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होत चालले आहे. हे होता कामा नये. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायला हवे, संपत्तीचेही विकेंद्रीकरण व्हायला हवे. आर्थिक स्थितीमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत, त्यात सीएची भूमिका खूप महत्त्वाची आहे."

भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, "जीडीपीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान समान नाहीये. जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा २२ ते २४ टक्के आहे. सेवा क्षेत्राचा ५२ ते ५४ टक्के, तर कृषि क्षेत्राचा वाटा फक्त १२ टक्के आहे. यात ६५ ते ७० टक्के ग्रामीण लोकसंख्या आहे."

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरEconomyअर्थव्यवस्था