शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शपथ घ्या, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल; धनंजय मुंडेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 17:31 IST

पक्षाला २५ वर्ष होत असताना तरुणाला लाजवेल इतके काम शरद पवार करतायेत. तरुणाईला राष्ट्रवादीत खूप संधी आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले.

मुंबई - महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घटक पक्ष आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनवायचाय. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी नंबर वन असेलच पण राज्याचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घ्या अशा शब्दात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात धनंजय मुंडे म्हणाले की, सध्या जातपात धर्म यात लढाई सुरू आहे. जातीजातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण केला जातोय. अमरावतीच्या घटनेचे पडसाद कोल्हापूरात उमटतात याचा अर्थ काय? तुम्हाला जर खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा कळवळा आहे. मग ९०० वर्ष मुघलांनी देशावर राज्य केले, तरी हिंदु देशात संघटित आणि अखंडित राहिला, हिंदूंना कधी मोर्चा काढावा लागला नाही. मग गेल्या १० वर्षात हिंदूंचे मोर्चे स्वत:चे रक्षण करण्यासाठी निघत असतील तर कोण देशात सुरक्षित आहे? असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच शरद पवार हे आपले दैवत आहे, ५६ व्या वर्ष समाजासाठी काम करतायेत, पक्षाला २५ वर्ष होत असताना तरुणाला लाजवेल इतके काम शरद पवार करतायेत. तरुणाईला राष्ट्रवादीत खूप संधी आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचा अभिमान वाटतो. ज्या ज्यावेळी शरद पवारांचे समाजकारण आणि राजकारण पाहायला मिळते तर शरद पवार हे विद्यापीठ आहेत. स्वराज्यात ज्यापद्धतीने महिलांना सन्मान होता तेव्हा राज्यात महिलांना सन्मान देण्याचं काम शरद पवारांनी केले असं कौतुक मुंडेंनी भाषणात केले. 

दरम्यान, आमच्यासारख्यांनी कधीही स्वप्नात मंत्री होऊ ही महत्त्वकांक्षा राजकारणात ठेवली नाही. पण आम्हाला मंत्रिपदे देऊन महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा घडवून आणली. ते शरद पवारच करू शकतात. संकटे अनेक आहेत. तेलंगणातील बीआरएस, वंचित येतेय. येणाऱ्या काळात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १ नंबरचा झाला पाहिजे. न्यूज अरेना नावाचा सर्व्हे आला, पण न्यूज अरेना इंडिया कुणाची आहे हे काढले तर ती भाजपाची असून पायात साप सोडायचे काम करतात तशी ही संस्था आहे. त्यात काही खरे नाही असंही धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस