शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

२०१४-२०१९ या काळातही शिवसेनेने...; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा नवा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:24 IST

निवडणुकीवेळीच भाजपाच्या कमी जागा आल्या तर सोबत घ्यायचं नाही हे ठरलेले होते. संजय राऊत यांनी मोठी भूमिका निभावली.

कोल्हापूर – राज्यात मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आणि महाविकास आघाडी स्थापन केली. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. एकेकाळचे कट्टर विरोधी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून शिवसेनेने(Shivsena) राज्यात मुख्यमंत्री बनवला. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भारतीय जनता पार्टीला विरोधात बसावं लागले.

त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. कालचक्र नेहमी फिरत असते. आता महाराष्ट्रात तुम्ही आहात, केंद्रात आम्ही आहोत. २०१४ ते २०१९ या कालावधीतही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा ३ वेळा प्रयत्न झाला. परंतु त्यावेळी ते जमलं नाही. व्हायचं नव्हतं मग ते आता का जमलं? त्यावेळी आमचे १२२ आमदार निवडून आले होते. मात्र दुर्दैवाने आता १२०-१३० आकडा क्रॉस करू शकलो नाही. थोडे कमी जास्त असते तर अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले असते असं त्यांनी सांगितले.

मात्र निवडणुकीवेळीच भाजपाच्या कमी जागा आल्या तर सोबत घ्यायचं नाही हे ठरलेले होते. संजय राऊत यांनी मोठी भूमिका निभावली. २०१४-२०१९ या काळात एकदा तर अर्थसंकल्पीय अधिवेशनातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा डाव होता. मात्र देवेंद्र फडणवीसांमुळे ते यशस्वी झालं नाही. निवडणुकीचे निकाल लागत होते. फडणवीस आणि मी पाहत होतो. तेव्हा युतीनं १६१ आकडा गाठला. त्यानंतर आम्ही उद्धवजींना फोन करून पत्रकार परिषद घेऊ असं म्हटलं. पण माझी पीसी वेगळी घेणार असे ते म्हणाले. तेव्हाच देवेंद्र फडणवीसांनी दादा, कुछ गडबड है असं म्हटलं. उद्धव ठाकरेंनी पीसी घेतली आणि आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं विधान केले असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, संजय राऊतांना शरद पवारांनी काम दिले. भाजपा आणि शिवसेनेत अंतर निर्माण करा. रोज तेल ओता, बाकी आम्ही बघतो. त्यानंतर अनेक घटना घडल्या. संजय राऊत तेल घालत राहिले आणि अंतर वाढत गेले. मात्र यात शिवसेनेचा खुर्ची मिळाली पण हिंदुत्वाचा प्लॅन उद्ध्वस्त करायचा हे त्यांच्या लक्षात आले नाही. आता कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत एकदा जर शिवसेनेचा मतदार हाताला मतदान करायला लागला तर तो पुन्हा शिवसेनेकडे येणार नाही असंही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस