शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

२०१४-२०१९ या काळातही शिवसेनेने...; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा नवा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:24 IST

निवडणुकीवेळीच भाजपाच्या कमी जागा आल्या तर सोबत घ्यायचं नाही हे ठरलेले होते. संजय राऊत यांनी मोठी भूमिका निभावली.

कोल्हापूर – राज्यात मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आणि महाविकास आघाडी स्थापन केली. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. एकेकाळचे कट्टर विरोधी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून शिवसेनेने(Shivsena) राज्यात मुख्यमंत्री बनवला. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भारतीय जनता पार्टीला विरोधात बसावं लागले.

त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. कालचक्र नेहमी फिरत असते. आता महाराष्ट्रात तुम्ही आहात, केंद्रात आम्ही आहोत. २०१४ ते २०१९ या कालावधीतही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा ३ वेळा प्रयत्न झाला. परंतु त्यावेळी ते जमलं नाही. व्हायचं नव्हतं मग ते आता का जमलं? त्यावेळी आमचे १२२ आमदार निवडून आले होते. मात्र दुर्दैवाने आता १२०-१३० आकडा क्रॉस करू शकलो नाही. थोडे कमी जास्त असते तर अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले असते असं त्यांनी सांगितले.

मात्र निवडणुकीवेळीच भाजपाच्या कमी जागा आल्या तर सोबत घ्यायचं नाही हे ठरलेले होते. संजय राऊत यांनी मोठी भूमिका निभावली. २०१४-२०१९ या काळात एकदा तर अर्थसंकल्पीय अधिवेशनातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा डाव होता. मात्र देवेंद्र फडणवीसांमुळे ते यशस्वी झालं नाही. निवडणुकीचे निकाल लागत होते. फडणवीस आणि मी पाहत होतो. तेव्हा युतीनं १६१ आकडा गाठला. त्यानंतर आम्ही उद्धवजींना फोन करून पत्रकार परिषद घेऊ असं म्हटलं. पण माझी पीसी वेगळी घेणार असे ते म्हणाले. तेव्हाच देवेंद्र फडणवीसांनी दादा, कुछ गडबड है असं म्हटलं. उद्धव ठाकरेंनी पीसी घेतली आणि आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं विधान केले असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, संजय राऊतांना शरद पवारांनी काम दिले. भाजपा आणि शिवसेनेत अंतर निर्माण करा. रोज तेल ओता, बाकी आम्ही बघतो. त्यानंतर अनेक घटना घडल्या. संजय राऊत तेल घालत राहिले आणि अंतर वाढत गेले. मात्र यात शिवसेनेचा खुर्ची मिळाली पण हिंदुत्वाचा प्लॅन उद्ध्वस्त करायचा हे त्यांच्या लक्षात आले नाही. आता कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत एकदा जर शिवसेनेचा मतदार हाताला मतदान करायला लागला तर तो पुन्हा शिवसेनेकडे येणार नाही असंही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस