शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

२०१४-२०१९ या काळातही शिवसेनेने...; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा नवा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:24 IST

निवडणुकीवेळीच भाजपाच्या कमी जागा आल्या तर सोबत घ्यायचं नाही हे ठरलेले होते. संजय राऊत यांनी मोठी भूमिका निभावली.

कोल्हापूर – राज्यात मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आणि महाविकास आघाडी स्थापन केली. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. एकेकाळचे कट्टर विरोधी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून शिवसेनेने(Shivsena) राज्यात मुख्यमंत्री बनवला. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भारतीय जनता पार्टीला विरोधात बसावं लागले.

त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. कालचक्र नेहमी फिरत असते. आता महाराष्ट्रात तुम्ही आहात, केंद्रात आम्ही आहोत. २०१४ ते २०१९ या कालावधीतही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा ३ वेळा प्रयत्न झाला. परंतु त्यावेळी ते जमलं नाही. व्हायचं नव्हतं मग ते आता का जमलं? त्यावेळी आमचे १२२ आमदार निवडून आले होते. मात्र दुर्दैवाने आता १२०-१३० आकडा क्रॉस करू शकलो नाही. थोडे कमी जास्त असते तर अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले असते असं त्यांनी सांगितले.

मात्र निवडणुकीवेळीच भाजपाच्या कमी जागा आल्या तर सोबत घ्यायचं नाही हे ठरलेले होते. संजय राऊत यांनी मोठी भूमिका निभावली. २०१४-२०१९ या काळात एकदा तर अर्थसंकल्पीय अधिवेशनातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा डाव होता. मात्र देवेंद्र फडणवीसांमुळे ते यशस्वी झालं नाही. निवडणुकीचे निकाल लागत होते. फडणवीस आणि मी पाहत होतो. तेव्हा युतीनं १६१ आकडा गाठला. त्यानंतर आम्ही उद्धवजींना फोन करून पत्रकार परिषद घेऊ असं म्हटलं. पण माझी पीसी वेगळी घेणार असे ते म्हणाले. तेव्हाच देवेंद्र फडणवीसांनी दादा, कुछ गडबड है असं म्हटलं. उद्धव ठाकरेंनी पीसी घेतली आणि आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं विधान केले असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, संजय राऊतांना शरद पवारांनी काम दिले. भाजपा आणि शिवसेनेत अंतर निर्माण करा. रोज तेल ओता, बाकी आम्ही बघतो. त्यानंतर अनेक घटना घडल्या. संजय राऊत तेल घालत राहिले आणि अंतर वाढत गेले. मात्र यात शिवसेनेचा खुर्ची मिळाली पण हिंदुत्वाचा प्लॅन उद्ध्वस्त करायचा हे त्यांच्या लक्षात आले नाही. आता कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत एकदा जर शिवसेनेचा मतदार हाताला मतदान करायला लागला तर तो पुन्हा शिवसेनेकडे येणार नाही असंही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस