शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

विधिमंडळ अधिवेशन चार आठवड्यांचे, राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 12:19 IST

यासंदर्भात झालेल्या बैठकीत अधिवेशनातील कामकाजाच्या स्वरूपावर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यापूर्वी परंपरेप्रमाणे ‘वंदे मातरम्’ गीत होईलच; पण त्यानंतर पहिल्यांदाच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही वाजविण्यात येणार आहे.  

मुंबई : राज्य विधिमंडळाचे चार आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होणार आहे. या संदर्भात कामकाज सल्लागार समितीची बैठक बुधवारी झाली. ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालेल. 

यासंदर्भात झालेल्या बैठकीत अधिवेशनातील कामकाजाच्या स्वरूपावर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यापूर्वी परंपरेप्रमाणे ‘वंदे मातरम्’ गीत होईलच; पण त्यानंतर पहिल्यांदाच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही वाजविण्यात येणार आहे.  

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८  मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर  तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर सहा दिवस चर्चा होईल.  विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची  मान्यता प्राप्त) ५  आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची  मान्यता अपेक्षित) ८ अशी अंदाजे १३ विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृश्यप्रणालीद्वारे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.  

अधिवेशन पाच आठवड्यांचे हवे : अजित पवारअर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवड्यांचे व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली. आमदारांना भागातील प्रश्न मांडायचे आहेत, चर्चा करायची आहे. त्यामुळे सरकारने पळवाट काढू नये. 

हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनांच्यावेळी संबंधित  मंत्री उपस्थित नव्हते, असे दिसून आले होते.  त्यामुळे याची पुनरावृत्ती होऊ नये आणि मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहून सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBudgetअर्थसंकल्प 2023Maharashtraमहाराष्ट्र