शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

मदत नव्हे, ही तर शेतकऱ्यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला ८६ रुपयेच भरपाई

By राजाराम लोंढे | Updated: September 27, 2025 12:49 IST

मातीत घातलेल्या बियाण्याचे तरी पैसे द्या 

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य सरकारने ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीस मंजुरी दिली आहे. पण, मंजूर निधी पाहिला तर सरासरी गुंठ्याला ८६ रुपये मिळणार आहेत. परिपक्व अवस्थेतील पिकांचे नुकसान झालेले आहे, त्यामुळे पूर्व मशागत, बियाणे, भांगलण, औषध व खत याचा खर्च शेतकऱ्याला करावा लागला आहे. सरकार मुळात मदत देतानाच ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देते. मात्र, या मदतीतून त्याने मातीत घातलेल्या बियाण्याचा खर्चही निघत नाही.ऑगस्टमध्ये राज्यात १५ लाख ४५ हजार २५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शासनाच्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले हे क्षेत्र आहे. पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना नुकसान झाल्याने शेतकऱ्याने काढणीचा सोडला तर सर्व खर्च केलेला असतो. सोयाबीनची पेरणी गुंठ्याला दीड किलो लागते. साधारणत: शंभर रुपये किलो सोयाबीन बियाण्याचा दर आहे. शेतकऱ्याने मातीत दीडशे रुपये घातले आणि सरकार मदत देणार ८६ रुपये. पेरणीपूर्व व नंतरचा खर्च सोडा किमान मातीत बियाण्याच्या रुपाने मातीत घातलेले पैसे तरी सरकारने द्यावेत.

नुकसानीच्या ९ टक्के मदतसरकारच्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देते. ऊस पिकाचा विचार केल्यास गुंठ्याला टनाचे उत्पादन धरले तर त्याचे ३ हजार रुपये होतात. सरकारचे म्हणते किमान ३३ टक्के नुकसान झाले, मिळणाऱ्या उत्पादनाच्या ३३ टक्के भरपाई म्हणजे गुंठ्याला किमान ९०० रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, सरकार केवळ ८६ रुपये देते.

शेती पिकाचे नुकसान झाल्यास, प्रतिगुंठा

  • जिरायत जमिनीवरील पिके - ४२.५० रुपये
  • सिंचनाखालील जमिनीतील पिकांसाठी- १७० रुपये
  • बहुवार्षिक बागायती पिकांसाठी - २२५ रुपये
  • शेतजमिनीचे नुकसान झाल्यास - १८० रुपये
  • दरड कोसळून नुकसान, माती वाहून गेल्यास - ४७० रुपये

संपूर्ण महाराष्ट्र संकटात असताना नुकसानीचे पंचनामे कसले करता? तातडीने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. सरकारची मदत पाहिली तर गुंठ्याला ८६ रुपये दिली आहे. यातून शेतकऱ्यांचे बियाण्याचे पैसेही मिळत नाहीत. कर्जमाफी केल्याशिवाय आता शेतकरी उभाच राहू शकत नाही. - राजू शेट्टी (नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना)

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers mocked with paltry compensation: ₹86 per Guntha relief.

Web Summary : Farmers are dismayed by the state government's meager compensation for crop damage, receiving only ₹86 per Guntha. This amount barely covers the cost of seeds, let alone other expenses incurred during cultivation. Experts highlight the inadequacy of the relief compared to the actual losses suffered.