शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 05:58 IST

सत्तेवर येण्यापूर्वी महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर यासंदर्भात विरोधकांकडून वारंवार सरकारला विचारणा करण्यात येत होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पॅकेज जाहीर केल्यानंतरही शेतकरी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन आमचे सरकार पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

सत्तेवर येण्यापूर्वी महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर यासंदर्भात विरोधकांकडून वारंवार सरकारला विचारणा करण्यात येत होती. आता पॅकेज जाहीर केल्याने कर्जमाफीचे काय, असा प्रश्न विचारला जात आहे; यावर मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आमचे सरकार पूर्ण करणारच. उद्धव ठाकरेंनी केलेली कर्जमाफी २० हजार कोटी रुपयांची होती, मी मुख्यमंत्री असताना केलेली कर्जमाफीही २० हजार कोटींची होती. त्यामुळे ठाकरेंनी काही वेगळे केलेले नाही. उलट नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन ठाकरेंनी पाळले नाही, ते पैसे आम्ही दिले. आता पॅकेजअंतर्गत आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटींची थेट मदत देणार आहोत. या घडीला कर्जमाफीपेक्षा थेट मदत गरजेची आहे.

दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी विरोधानी केली आहे.

तब्बल ६० हजार एकर शेतीचे झाले वाळवंटराज्यात १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकाची लागवड, पैकी ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान. त्यातील ६० हजार एकर शेती खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत शेतकऱ्यांना मदत देताना ॲग्रीस्टॅकमधील माहिती ग्राह्य धरली जाणार आहे. मदतीसाठी शेतकऱ्यांना कुठलीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. जे शेतकरी मदतीच्या निकषात बसणार नाहीत, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत दिली जाणार आहे.साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रति टन ५ रुपये कापण्याच्या निर्णयावर टीका होत असून, त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, या पाच रुपयांचा विचार केला तर फक्त ५० कोटी रुपये मिळतात. कारखान्यांकडून हे पैसे घेतले जाणार आहेत, शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून पैसे कापले जाणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.पूरग्रस्तांसाठी अचानक तरतूद करावी लागल्यामुळे विकासकामांवर ताण येईल. काही ठिकाणी काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल, असेही ते म्हणाले.

दुधाळ जनावरांच्या मर्यादाची अट काढलीदुधाळ जनावरे दगावली असल्यास तीन जनावरांपर्यंतच मदत मिळत होती, आता ही मर्यादेची अट काढून टाकली आहे. रब्बी पिकांच्या नुकासानीसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये दिले जाणार आहेत. विहिरींच्या नुकसानीसाठी आतापर्यंत मदत मिळत नव्हती, यावेळी ती प्रति विहीर ३० हजार रुपये दिली जाणार आहे. तातडीच्या मदतीसाठी १५०० कोटी रुपये जिल्हा नियोजन निधीत राखीव ठेवण्यात आले आहेत.तीन हेक्टरपर्यंत मदतएनडीआरएफच्या निकषानुसार कोरडवाहू जमिनीसाठी पूर्वी ८,५०० रुपये मदत मिळत होती, ती आता १८ हजार ५०० करण्यात आली आहे. हंगामी बागायतीसाठी १७ हजार ऐवजी २७ हजार, तर बागायतीसाठी २२ हजार ५०० ऐवजी ३२ हजार ५०० रुपये मदत दोनऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Government Will Fulfill Loan Waiver Promise: CM Fadnavis Reaffirms

Web Summary : Chief Minister Fadnavis reiterated the government's commitment to the farmer loan waiver. Direct aid of ₹21,000 crore will be given. Farmers affected by heavy rains will receive assistance, with relaxed criteria and increased compensation for crop and well damage.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस