शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 05:58 IST

सत्तेवर येण्यापूर्वी महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर यासंदर्भात विरोधकांकडून वारंवार सरकारला विचारणा करण्यात येत होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पॅकेज जाहीर केल्यानंतरही शेतकरी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन आमचे सरकार पूर्ण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

सत्तेवर येण्यापूर्वी महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर यासंदर्भात विरोधकांकडून वारंवार सरकारला विचारणा करण्यात येत होती. आता पॅकेज जाहीर केल्याने कर्जमाफीचे काय, असा प्रश्न विचारला जात आहे; यावर मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आमचे सरकार पूर्ण करणारच. उद्धव ठाकरेंनी केलेली कर्जमाफी २० हजार कोटी रुपयांची होती, मी मुख्यमंत्री असताना केलेली कर्जमाफीही २० हजार कोटींची होती. त्यामुळे ठाकरेंनी काही वेगळे केलेले नाही. उलट नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन ठाकरेंनी पाळले नाही, ते पैसे आम्ही दिले. आता पॅकेजअंतर्गत आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटींची थेट मदत देणार आहोत. या घडीला कर्जमाफीपेक्षा थेट मदत गरजेची आहे.

दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी विरोधानी केली आहे.

तब्बल ६० हजार एकर शेतीचे झाले वाळवंटराज्यात १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकाची लागवड, पैकी ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान. त्यातील ६० हजार एकर शेती खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत शेतकऱ्यांना मदत देताना ॲग्रीस्टॅकमधील माहिती ग्राह्य धरली जाणार आहे. मदतीसाठी शेतकऱ्यांना कुठलीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. जे शेतकरी मदतीच्या निकषात बसणार नाहीत, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत दिली जाणार आहे.साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रति टन ५ रुपये कापण्याच्या निर्णयावर टीका होत असून, त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, या पाच रुपयांचा विचार केला तर फक्त ५० कोटी रुपये मिळतात. कारखान्यांकडून हे पैसे घेतले जाणार आहेत, शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून पैसे कापले जाणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.पूरग्रस्तांसाठी अचानक तरतूद करावी लागल्यामुळे विकासकामांवर ताण येईल. काही ठिकाणी काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल, असेही ते म्हणाले.

दुधाळ जनावरांच्या मर्यादाची अट काढलीदुधाळ जनावरे दगावली असल्यास तीन जनावरांपर्यंतच मदत मिळत होती, आता ही मर्यादेची अट काढून टाकली आहे. रब्बी पिकांच्या नुकासानीसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये दिले जाणार आहेत. विहिरींच्या नुकसानीसाठी आतापर्यंत मदत मिळत नव्हती, यावेळी ती प्रति विहीर ३० हजार रुपये दिली जाणार आहे. तातडीच्या मदतीसाठी १५०० कोटी रुपये जिल्हा नियोजन निधीत राखीव ठेवण्यात आले आहेत.तीन हेक्टरपर्यंत मदतएनडीआरएफच्या निकषानुसार कोरडवाहू जमिनीसाठी पूर्वी ८,५०० रुपये मदत मिळत होती, ती आता १८ हजार ५०० करण्यात आली आहे. हंगामी बागायतीसाठी १७ हजार ऐवजी २७ हजार, तर बागायतीसाठी २२ हजार ५०० ऐवजी ३२ हजार ५०० रुपये मदत दोनऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Government Will Fulfill Loan Waiver Promise: CM Fadnavis Reaffirms

Web Summary : Chief Minister Fadnavis reiterated the government's commitment to the farmer loan waiver. Direct aid of ₹21,000 crore will be given. Farmers affected by heavy rains will receive assistance, with relaxed criteria and increased compensation for crop and well damage.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस