शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सरकार प्रत्येक धर्माचा आदर करते, पण...; माहिम मजार प्रकरणावर दीपक केसरकर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:54 IST

सीआरझेडमध्ये कुठलेही काम करताना परवानगी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकही कोर्टाने रोखले आहे असंही केसरकरांनी सांगितले.

मुंबई - सरकार सर्व धर्माचा आदर करते, परंतु जर कुणी अनधिकृत बांधकाम करत असेल तर त्यावर कारवाई होईल. राज ठाकरेंनी भाषणात जे बांधकाम निदर्शनास आणले. त्यावर सीआरझेड कायद्यानुसार कारवाई झाली आहे. या गोष्टी हळूहळू बांधल्या जातात त्यामुळे सहसा त्याच्यावर लक्ष जात नाही. मात्र हे समोर आल्यानंतर सरकारने योग्य ती पावले उचलली आहेत असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सीआरझेडमध्ये कुठलेही काम करताना परवानगी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकही कोर्टाने रोखले आहे. जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोवर आम्हीही काम सुरू करू शकत नाही. राज ठाकरेंनी भाषणात जो मुद्दा उचलला आहे तो बिल्कुल योग्य आहे. यात धर्माचा विषय नाही. पालकमंत्री म्हणून आम्हीही हाजीअलीला जाण्यासाठी नवीन प्रकल्प हाती घेतोय. त्याचीही परवानगी रखडली आहे. लवकरच ते काम होईल. सरकार प्रत्येक धर्माचा आदर करते परंतु जर कुणी चुकीचे काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी असं त्यांनी सांगितले. 

तसेच सीआरझेड कायद्यानुसार कारवाई झाली आहे. ती चुकीची नाही. समुद्रात कुठलेही बांधकाम करता येत नाही. कुणी हे करत असेल तर ते सावधरितीने करतात. जी दगडे मजारीजवळ आहेत तीदेखील हटवण्यात येतील. तो परिसर स्वच्छ होईल. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचे निरसन होईल. राज ठाकरेंनी जो मुद्दा निदर्शनास आणला त्यावर आता कारवाई झाली. अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे असंही मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, नियमांचे पालन व्हायलाच पाहिजे. जे कुणी करणार नाही त्यांच्यावर वेळेवर प्रतिबंध करावे लागेल. सरकार कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. धर्माच्या नावाखाली कुणी अनधिकृत काम करत असेल तर योग्य नाही. अनधिकृत बांधकामाचा दर्गा अथवा मशिदीशी काही संबंध नाही. जे सीआरझेडचे नियम होते त्यानुसार कारवाई झाली आहे असं दीपक केसरकरांनी सांगितले. 

...हा त्यांचा कौटुंबिक विषयराज ठाकरे जे बोलतायेत हा त्यांच्या अंतर्गत कौटुंबिक विषय आहे त्यावर मी बोलणार नाही. परंतु लोकांच्या ही गोष्ट जरूर निदर्शनास आली असेल की, लोक पक्ष सोडून जात होते तेव्हा बाळासाहेबांची इच्छा होती कुणी पक्ष सोडू नये. मात्र उद्धव ठाकरेंनी ज्यांना जायचे त्यांनी निघून जा असे स्पष्ट म्हटले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, पण उद्धव ठाकरेंचा तसा नाही. त्यामुळे अनेक लोक त्यांना सोडून जात आहे अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर