शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सरकार प्रत्येक धर्माचा आदर करते, पण...; माहिम मजार प्रकरणावर दीपक केसरकर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:54 IST

सीआरझेडमध्ये कुठलेही काम करताना परवानगी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकही कोर्टाने रोखले आहे असंही केसरकरांनी सांगितले.

मुंबई - सरकार सर्व धर्माचा आदर करते, परंतु जर कुणी अनधिकृत बांधकाम करत असेल तर त्यावर कारवाई होईल. राज ठाकरेंनी भाषणात जे बांधकाम निदर्शनास आणले. त्यावर सीआरझेड कायद्यानुसार कारवाई झाली आहे. या गोष्टी हळूहळू बांधल्या जातात त्यामुळे सहसा त्याच्यावर लक्ष जात नाही. मात्र हे समोर आल्यानंतर सरकारने योग्य ती पावले उचलली आहेत असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सीआरझेडमध्ये कुठलेही काम करताना परवानगी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकही कोर्टाने रोखले आहे. जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोवर आम्हीही काम सुरू करू शकत नाही. राज ठाकरेंनी भाषणात जो मुद्दा उचलला आहे तो बिल्कुल योग्य आहे. यात धर्माचा विषय नाही. पालकमंत्री म्हणून आम्हीही हाजीअलीला जाण्यासाठी नवीन प्रकल्प हाती घेतोय. त्याचीही परवानगी रखडली आहे. लवकरच ते काम होईल. सरकार प्रत्येक धर्माचा आदर करते परंतु जर कुणी चुकीचे काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी असं त्यांनी सांगितले. 

तसेच सीआरझेड कायद्यानुसार कारवाई झाली आहे. ती चुकीची नाही. समुद्रात कुठलेही बांधकाम करता येत नाही. कुणी हे करत असेल तर ते सावधरितीने करतात. जी दगडे मजारीजवळ आहेत तीदेखील हटवण्यात येतील. तो परिसर स्वच्छ होईल. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचे निरसन होईल. राज ठाकरेंनी जो मुद्दा निदर्शनास आणला त्यावर आता कारवाई झाली. अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे असंही मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, नियमांचे पालन व्हायलाच पाहिजे. जे कुणी करणार नाही त्यांच्यावर वेळेवर प्रतिबंध करावे लागेल. सरकार कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. धर्माच्या नावाखाली कुणी अनधिकृत काम करत असेल तर योग्य नाही. अनधिकृत बांधकामाचा दर्गा अथवा मशिदीशी काही संबंध नाही. जे सीआरझेडचे नियम होते त्यानुसार कारवाई झाली आहे असं दीपक केसरकरांनी सांगितले. 

...हा त्यांचा कौटुंबिक विषयराज ठाकरे जे बोलतायेत हा त्यांच्या अंतर्गत कौटुंबिक विषय आहे त्यावर मी बोलणार नाही. परंतु लोकांच्या ही गोष्ट जरूर निदर्शनास आली असेल की, लोक पक्ष सोडून जात होते तेव्हा बाळासाहेबांची इच्छा होती कुणी पक्ष सोडू नये. मात्र उद्धव ठाकरेंनी ज्यांना जायचे त्यांनी निघून जा असे स्पष्ट म्हटले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, पण उद्धव ठाकरेंचा तसा नाही. त्यामुळे अनेक लोक त्यांना सोडून जात आहे अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर