शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

संविधानाची मोडतोड काँग्रेस राजवटीतच, ते कुणीही बदलू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:33 IST

'भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या विषयावरील चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेस राजवटीत संविधानात सर्वाधिक बदल करण्यात आले. इंदिरा गांधींच्या राजवटीत संविधानात ९९ वेळा बदल करण्यात आले. मात्र देशाचे संविधान इतके परिपक्व झाले आहे की या संविधानाची कुणी छेडछाड करू शकत नाही आणि संविधान कुणी बदलू शकत नाही. त्यामुळे संविधान बदलण्याचा आरोप करणे बंद करा, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विरोधकांना लगावला.विधानसभेत मंगळवार आणि बुधवारी 'भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या विषयावरील चर्चा पार पडली. या चर्चेचा समारोप करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

देशाच्या सर्व संस्था कलंकित करायचे त्या संस्थांना अराजकतेकडे न्यायचे, आपल्याला सत्तेवर येता येत नाही, त्यामुळे संस्था बदनाम करायच्या, या संस्था बदनाम करतो, तेव्हा आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर अविश्वास दाखवतो. पण संविधानाने या संस्था अशा बळकट केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संविधानात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची आहेत. यातील काही तत्त्वांबाबत टीका होते. पण पहिले तत्त्व आहे, समान नागरी कायदा. डॉ. आंबेडकरांनी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या कलम ४४ मध्ये प्रत्येक राज्यावर ही जबाबदारी टाकली आहे की, त्या राज्याने समान नागरी कायदा आणला पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस