शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाची मोडतोड काँग्रेस राजवटीतच, ते कुणीही बदलू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:33 IST

'भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या विषयावरील चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेस राजवटीत संविधानात सर्वाधिक बदल करण्यात आले. इंदिरा गांधींच्या राजवटीत संविधानात ९९ वेळा बदल करण्यात आले. मात्र देशाचे संविधान इतके परिपक्व झाले आहे की या संविधानाची कुणी छेडछाड करू शकत नाही आणि संविधान कुणी बदलू शकत नाही. त्यामुळे संविधान बदलण्याचा आरोप करणे बंद करा, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विरोधकांना लगावला.विधानसभेत मंगळवार आणि बुधवारी 'भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या विषयावरील चर्चा पार पडली. या चर्चेचा समारोप करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

देशाच्या सर्व संस्था कलंकित करायचे त्या संस्थांना अराजकतेकडे न्यायचे, आपल्याला सत्तेवर येता येत नाही, त्यामुळे संस्था बदनाम करायच्या, या संस्था बदनाम करतो, तेव्हा आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर अविश्वास दाखवतो. पण संविधानाने या संस्था अशा बळकट केल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संविधानात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची आहेत. यातील काही तत्त्वांबाबत टीका होते. पण पहिले तत्त्व आहे, समान नागरी कायदा. डॉ. आंबेडकरांनी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या कलम ४४ मध्ये प्रत्येक राज्यावर ही जबाबदारी टाकली आहे की, त्या राज्याने समान नागरी कायदा आणला पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस