शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सेवा हमी कायदा अंमलबजावणीचा मुख्य सचिव घेणार महिन्याला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 06:44 IST

६६२ सेवा कालमर्यादेत देण्याची हमी; ५० टक्के पदे रिक्त

मुंबई - शासकीय कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा मुदतीत मिळाव्यात यासाठी राज्यात सेवा हमी कायदा २०१५ पासून लागू केला होता. मात्र हा कायदा प्रभावी होऊन जनतेला जलद सेवा मिळाव्यात यासाठी दर महिन्याला सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्य सचिव यांना दिले जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 

विधानसभेत आमदार प्रकाश आबीटकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून राज्यातील शासकीय सेवा जनतेपर्यंत कालमर्यादेत पोहोचत नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कर्मचारी वर्ग शासनाने नेमला नसल्याचे सांगत या कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रचार आणि प्रसिद्धी शासनाकडून केली जात नाही. त्यामुळे ज्या सेवा शासनाकडून दिल्या जाणार आहे, त्या सेवांबाबत जनतेला माहितीच नसल्याचेही यावेळी आबीटकर म्हणाले. 

आधी मंत्रालयाचे सहा मजले तर सुधारा...बच्चू कडू कडाडलेआमदार बच्चू कडू यांनीही या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रशासनाला धारेवर धरत जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयात योग्य काम करत नाहीत, ते या कायद्याची काय अंमलबजावणी करणार अशी संतप्त भावना व्यक्त करत आधी मंत्रालयातील सहा मजले सुधारा अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांची सही झालेली फाइल मंत्रालयातून चार वर्षांनी बाहेर पडते असे उदाहरण देत, कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार किती कारवाई झाली याची माहिती देण्याची मागणी कडू यांनी केली.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले... राज्यातील मुख्यसेवा आयुक्तांसह सहा सेवा आयुक्तांच्या नियुक्त्या झाल्या असून, कर्मचारी-अधिकारी वर्गाच्या मंजूर पदांपैकी ५० टक्केजागा रिक्त आहेत. या कायद्यांतर्गत एकूण ६६२ सेवा जनतेला ठरावीक कालमर्यादेत दिल्या जाण्याची हमी या कायद्यानुसार बंधनकारक केली असून, आजवर जवळपास ९५ टक्के अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. सदर कायद्यानुसार जनतेला कोणत्या सेवा किती दिवसात मिळणार आहे याचे नियम केले आहेत. मात्र, या सेवा कायद्याची जनतेला माहिती व्हावी आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि प्रचार करण्यात येईल.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईVidhan Parishadविधान परिषद