शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 19:11 IST

"खरेतर, मी आणि बाळा नांदगावकर, आम्ही दोघांनी यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, हात पुढे केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीच त्यांना हो म्हटले नाही नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, "एक म्यान में दो तलवारे नही रहती है." 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात का? यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रोखठोक भाष्य केले आहे. "दोघेही एकाच व्यासपीठावर, एकाच ठिकाणी येणार असतील, तर निश्चितपणे त्यात मराठी माणसाचे हित आहे. अले पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आज आहे आणि कालही होतं. खरेतर, मी आणि बाळा नांदगावकर, आम्ही दोघांनी यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, हात पुढे केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीच त्यांना हो म्हटले नाही नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, "एक म्यान में दो तलवारे नही रहती है." 

कदम पुढे म्हणाले, "मला अजून आठवतंय, हे वाक्य तेव्हा उद्धव ठाकरे यांचे होते आणि राज ठाकरे यांची तेव्हा मागणी काय होती? फक्त माझ्याकडे दोन जिल्हे द्या, एक पुणे आणि नाशिक, बाकी उद्धवने सांभाळावे. तेव्हा उद्धव ठाकरे नाही म्हणाले होते. आता वेळ अशी आलेली आहे की, उद्धव ठाकरे यांच्या हातात सगळंच गेलंय. आकाश फाटलंय, आता ठिकाण लावणार कुठे? मग राज ठाकरे जर येत असतील तर त्यांचा आधार घेऊन थोडासा आपल्याला राजकारणामध्ये डोकं वर काढता येईल का? हा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा असावा." कदम टीव्ही९ मराठीसोबत बोलत होते.

आता अटीशर्ती घालण्याचा प्रश्न कुठे येतो? -"मी त्या दोघांना जवळून पाहिलंय. राज ठाकरे स्पष्ट बोलणारे आहेत, आतल्या काठीचे नाहीयेत, ओपन आहेत. पण उद्धव ठाकरे आतल्या काठीचा माणूस आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरेना कधीच पुढे येऊ देणार नाही. आता अटीशर्ती घालण्याचा प्रश्न कुठे येतो? तुम्ही भाऊ आहात ना दोघेही?" असा सवालही यावेळी रामदास कमद यांनी केला.

'ती' शिवसेनेकडून झालेली मोठी चूक -महाबळेश्वर येथील कार्यक्रमाचा संदर्भात देत कदम म्हणाले, "त्यावेळेला एक चूक झाली आमच्याकडून. मी आता अधिक स्पष्टपणे बोलणार नाही. महाबळेश्वरला ज्यावेळी उद्धव ठाकरेना अध्यक्ष केले, त्यावेळी राज ठाकरेना अध्यक्ष करायला हवे होते. ही शिवसेनेकडून झालेली मोठी चूक आहे. मोठी कुठे चूक आहे. राज ठाकरे तेव्हा अध्यक्ष झाले असते तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. शिवसेना फुटली नसती." एवढेच नाही तर, "राज ठाकरे यांच्याकडे माणसं ओळखण्याची किमया आहे. ते पण वाघासारखे माणूस आहेत, त्यांना वाघासारखी माणसं लागतात. उद्धव ठाकरेना सुभाष देसाईंसारखी माणसं लागतात, शेळ्या-मेंढ्या," असेही कदम म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे