शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 19:11 IST

"खरेतर, मी आणि बाळा नांदगावकर, आम्ही दोघांनी यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, हात पुढे केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीच त्यांना हो म्हटले नाही नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, "एक म्यान में दो तलवारे नही रहती है." 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात का? यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रोखठोक भाष्य केले आहे. "दोघेही एकाच व्यासपीठावर, एकाच ठिकाणी येणार असतील, तर निश्चितपणे त्यात मराठी माणसाचे हित आहे. अले पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आज आहे आणि कालही होतं. खरेतर, मी आणि बाळा नांदगावकर, आम्ही दोघांनी यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, हात पुढे केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीच त्यांना हो म्हटले नाही नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, "एक म्यान में दो तलवारे नही रहती है." 

कदम पुढे म्हणाले, "मला अजून आठवतंय, हे वाक्य तेव्हा उद्धव ठाकरे यांचे होते आणि राज ठाकरे यांची तेव्हा मागणी काय होती? फक्त माझ्याकडे दोन जिल्हे द्या, एक पुणे आणि नाशिक, बाकी उद्धवने सांभाळावे. तेव्हा उद्धव ठाकरे नाही म्हणाले होते. आता वेळ अशी आलेली आहे की, उद्धव ठाकरे यांच्या हातात सगळंच गेलंय. आकाश फाटलंय, आता ठिकाण लावणार कुठे? मग राज ठाकरे जर येत असतील तर त्यांचा आधार घेऊन थोडासा आपल्याला राजकारणामध्ये डोकं वर काढता येईल का? हा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा असावा." कदम टीव्ही९ मराठीसोबत बोलत होते.

आता अटीशर्ती घालण्याचा प्रश्न कुठे येतो? -"मी त्या दोघांना जवळून पाहिलंय. राज ठाकरे स्पष्ट बोलणारे आहेत, आतल्या काठीचे नाहीयेत, ओपन आहेत. पण उद्धव ठाकरे आतल्या काठीचा माणूस आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरेना कधीच पुढे येऊ देणार नाही. आता अटीशर्ती घालण्याचा प्रश्न कुठे येतो? तुम्ही भाऊ आहात ना दोघेही?" असा सवालही यावेळी रामदास कमद यांनी केला.

'ती' शिवसेनेकडून झालेली मोठी चूक -महाबळेश्वर येथील कार्यक्रमाचा संदर्भात देत कदम म्हणाले, "त्यावेळेला एक चूक झाली आमच्याकडून. मी आता अधिक स्पष्टपणे बोलणार नाही. महाबळेश्वरला ज्यावेळी उद्धव ठाकरेना अध्यक्ष केले, त्यावेळी राज ठाकरेना अध्यक्ष करायला हवे होते. ही शिवसेनेकडून झालेली मोठी चूक आहे. मोठी कुठे चूक आहे. राज ठाकरे तेव्हा अध्यक्ष झाले असते तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. शिवसेना फुटली नसती." एवढेच नाही तर, "राज ठाकरे यांच्याकडे माणसं ओळखण्याची किमया आहे. ते पण वाघासारखे माणूस आहेत, त्यांना वाघासारखी माणसं लागतात. उद्धव ठाकरेना सुभाष देसाईंसारखी माणसं लागतात, शेळ्या-मेंढ्या," असेही कदम म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे