शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 19:11 IST

"खरेतर, मी आणि बाळा नांदगावकर, आम्ही दोघांनी यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, हात पुढे केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीच त्यांना हो म्हटले नाही नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, "एक म्यान में दो तलवारे नही रहती है." 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात का? यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रोखठोक भाष्य केले आहे. "दोघेही एकाच व्यासपीठावर, एकाच ठिकाणी येणार असतील, तर निश्चितपणे त्यात मराठी माणसाचे हित आहे. अले पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आज आहे आणि कालही होतं. खरेतर, मी आणि बाळा नांदगावकर, आम्ही दोघांनी यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, हात पुढे केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीच त्यांना हो म्हटले नाही नाही. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, "एक म्यान में दो तलवारे नही रहती है." 

कदम पुढे म्हणाले, "मला अजून आठवतंय, हे वाक्य तेव्हा उद्धव ठाकरे यांचे होते आणि राज ठाकरे यांची तेव्हा मागणी काय होती? फक्त माझ्याकडे दोन जिल्हे द्या, एक पुणे आणि नाशिक, बाकी उद्धवने सांभाळावे. तेव्हा उद्धव ठाकरे नाही म्हणाले होते. आता वेळ अशी आलेली आहे की, उद्धव ठाकरे यांच्या हातात सगळंच गेलंय. आकाश फाटलंय, आता ठिकाण लावणार कुठे? मग राज ठाकरे जर येत असतील तर त्यांचा आधार घेऊन थोडासा आपल्याला राजकारणामध्ये डोकं वर काढता येईल का? हा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा असावा." कदम टीव्ही९ मराठीसोबत बोलत होते.

आता अटीशर्ती घालण्याचा प्रश्न कुठे येतो? -"मी त्या दोघांना जवळून पाहिलंय. राज ठाकरे स्पष्ट बोलणारे आहेत, आतल्या काठीचे नाहीयेत, ओपन आहेत. पण उद्धव ठाकरे आतल्या काठीचा माणूस आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरेना कधीच पुढे येऊ देणार नाही. आता अटीशर्ती घालण्याचा प्रश्न कुठे येतो? तुम्ही भाऊ आहात ना दोघेही?" असा सवालही यावेळी रामदास कमद यांनी केला.

'ती' शिवसेनेकडून झालेली मोठी चूक -महाबळेश्वर येथील कार्यक्रमाचा संदर्भात देत कदम म्हणाले, "त्यावेळेला एक चूक झाली आमच्याकडून. मी आता अधिक स्पष्टपणे बोलणार नाही. महाबळेश्वरला ज्यावेळी उद्धव ठाकरेना अध्यक्ष केले, त्यावेळी राज ठाकरेना अध्यक्ष करायला हवे होते. ही शिवसेनेकडून झालेली मोठी चूक आहे. मोठी कुठे चूक आहे. राज ठाकरे तेव्हा अध्यक्ष झाले असते तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. शिवसेना फुटली नसती." एवढेच नाही तर, "राज ठाकरे यांच्याकडे माणसं ओळखण्याची किमया आहे. ते पण वाघासारखे माणूस आहेत, त्यांना वाघासारखी माणसं लागतात. उद्धव ठाकरेना सुभाष देसाईंसारखी माणसं लागतात, शेळ्या-मेंढ्या," असेही कदम म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे