शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता ठाण्यालाही मिळणार

By admin | Updated: April 23, 2016 18:23 IST

नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता नवी मुंबईबरोबरच ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे

ठाणे, दि. २३ - नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता नवी मुंबईबरोबरच ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात ट्विट केल्यानंतर या धरणाची पाहणी रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि ठाणे महापालिका आयुक्त सोमवारी करणार आहेत. 
 
कळवा- मुंब्य्रातील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीची पाणीकपात 60 तासांची झाल्याने सलग तीन दिवस येथील रहिवाशांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षापासून कळवा आणि रबाळेच्या दरम्यान पारसिक पुलाच्या मागे बंद असलेले रेल्वेचे डी धरण उपयोगात आणण्याबाबत ठाणे महापालिका आणि रेल्वे विभागाकडे मागणी करण्यात येत होती. यासाठी दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेकडे पत्रव्यवहारदेखील केला होता. तसेच ठाणे शहर मनसेचे प्रदीप सावर्डेकर यांनीदेखील पालिका आणि रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, काही दिवसांपूर्वी या धरणाचे पाणी नवी मुंबईला वळवण्यात मोलाचा वाटा उचलणारे खासदार राजन विचारे यांचा राष्ट्रवादी आणि मनसेने निषेध केला. त्यामुळे त्याच्या पाण्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले होते. 
 
तर, तिकडे नवी मुंबईला त्याचे पाणी मिळावे, यासाठी आधी तत्कालीन खासदार संजीव नाईक आणि आता राजन विचारे यांनी पाठपुरावा केला. विचारेंच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नवी मुंबईसाठी पाणी उचलण्यास गेल्या पंधरवडय़ात हिरवा कंदील दिल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने धरणातून पाणी शहरात आणण्यासाठी जलवाहिन्या टाकण्यासह तत्सम कामांच्या निविदा प्रक्रियाही सुरू केल्या आहेत.
 
मात्र, आता पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांची वाढती मागणी लक्षात घेता प्रभूंनी या धरणाचे पाणी नवी मुंबईसह ठाण्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
* आजघडीला या धरणाची क्षमता 4 दशलक्षलीटरची असून त्याची दुरुस्ती केल्यास ते  सुमारे 12 ते 15 दशलक्षलीटर क्षमतेचे शकणार आहे. त्याच्या जमिनीचा मालकी हक्क रेल्वेकडे असून ते मुंब्य्राच्या डोंगराच्या मागे रबाळे आणि पारसिकच्या मध्ये आहे. त्याची सध्याची स्थिती जरी व्यवस्थित नसली तरी त्याची पुनर्बाधणी करून त्या धरणाचा वापर केला जाऊ शकतो. त्याला डी धरण म्हणून संबोधले जाते.
 
* इंग्रजांच्या काळात जेव्हा रेल्वे ट्रॅक हा ठाण्याच्या पुढे न्यायचा होता, त्या वेळी येथे डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्याचे काम करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात बाहेरून मजूर आणले गेले होते. या मजुरांच्या निवा-याची व्यवस्था या डोंगरावर केली होती. परंतु, त्यांच्या पाण्याचा प्रश्न कायम होता, तेव्हा त्यांच्याकरिता रेल्वेने हे डी धरण बांधले. त्याच्या तीनही बाजूंनी डोंगर असून जाण्यासाठी एक रस्ता आहे. परिणामी, तिन्ही डोंगरांवरून पावसाळ्यात वाहत येणारे पाणी या धरणात साठवले जाते. त्याचा वापर वर्षभर केला जाऊ शकतो.
 
दरम्यान, आता या धरणातील अर्धे पाणी नवी मुंबईला आणि अर्धे ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या सूचनेनंतर आता सोमवारी या धरणाची संयुक्त पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सूद आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल करणार आहेत. यास आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
अंबरनाथ येथेही रेल्वेच्या मालकीचे आणखी एक धरण आहे. ते जीआयपी टँक (गेट्र इंडियन पेनिनसुला) या तत्कालीन रेल्वे कंपनीच्या नावाने ओळखले जाते. त्याची क्षमता 6 एमएलडी इतकी आहे. सध्या त्याच्या पाण्यावर रेल नीर हा रेल्वेचा मिनरल वॉटरचा प्रकल्प सुरू आहे.