शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

थॅलेसेमियाचे ५,५०० रुग्ण

By admin | Updated: July 26, 2016 02:10 IST

राज्यात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची संख्या पाच हजार ४९२ इतकी आहे. या रुग्णांपैकी दारिद्य्ररेषेखालील आणि गरीब रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात येत आहेत. तर, राजीव गांधी जीवनदायी

मुंबई : राज्यात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची संख्या पाच हजार ४९२ इतकी आहे. या रुग्णांपैकी दारिद्य्ररेषेखालील आणि गरीब रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात येत आहेत. तर, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत महत्त्वाच्या महागड्या शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत सांगितले. मुंबईसह राज्यात थेलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत असल्याबाबतचा मुद्दा जगन्नाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला. चर्चेला उत्तर देताना सावंत म्हणाले की, थॅलेसेमियाचे पाच हजार ४९२ रुग्ण असून मुंबई, ठाणे आणि ग्रामीण भागात एक हजार ७७७ रुग्ण आहेत. हा आजार अनुवांशिक असून आदिवासी, पंजाबी, सिंधी, मारवाडी, कुणबी आणि मुस्लीम समाजामध्ये या रोगाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येत आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये दरवर्षी वाढ होत असून यातील ४० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे मुंबईत आहेत, असे सावंत यांनी सांगितले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती या चार ठिकाणी डे केअर सेंटर अंतर्गत हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकलसेल अँनिमिया या आजारांचे निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले जाते, अशी माहितीही सावंत यांनी दिली. राज्यातील शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयामधून या रोगाबाबतची जनजागृती करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. निरंजन डावखरे, अनिल तटकरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले. (प्रतिनिधी)आकृतीबंधातील रिक्त पदे चार महिन्यात भरणारआकृतीबंधातील डॉक्टरांची रिक्त पदे चार महिन्यांत भरण्यात येतील, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली. यासंदभार्तील प्रश्न हेमंत टकले यांनी उपस्थित केला होता. नाशिकमधीलभारम प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खिर्डीसाठे व भुलेगाव उपकेंद्रांची बांधकामे पूर्ण झाली. त्यासाठी पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे सावंत यांनी सांगितले. आकृतीबंधातील एक हजार ६९२ एकत्रित पदांचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे. चार महिन्यांत भरण्यात येतील, असेही ते म्हणाले. ७५ टक्के बांधकामे पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांच्या पदनिर्मितीबाबतचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात येतात. त्यांच्या अहवालानंतर निर्णय घेतला जातो, असेही सावंत म्हणाले. नारायण राणे, सुनिल तटकरे, जयंत पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले.