शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

ठामपाची वसुली तब्बल २५६ कोटींनी वाढली

By admin | Updated: April 7, 2017 03:16 IST

२०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध करांच्या स्वरुपात केलेली वसुली ही मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल २५६.८२ कोटींनी अधिक झाली

ठाणे : ठाणे महापालिकेने वसुलीसाठी विविध मार्गांचा अवलंब केल्यानंतर २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध करांच्या स्वरुपात केलेली वसुली ही मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल २५६.८२ कोटींनी अधिक झाली आहे. विशेष म्हणजे दिलेल्या सुधारीत लक्ष्याचा पाठलाग करण्यातही पालिकेला यश आले आहे.ठाणे महापालिकेमार्फत यंदा विविध करांची वसुलीसाठी नाना शकला अवलंबविल्या होत्या. त्यामध्ये सुरुवातीला नोटिसा बजावणे, जप्तीची कारवाई आणि त्यातही प्रत्येक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेले टार्गेट यामुळे पालिकेच्या उत्पन्नात यंदा प्रथमच भरघोस वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जकात आणि एलबीटी बंदीनंतर झालेली ही वाढ उल्लेखनीय अशीच म्हणावी लागणार आहे. महापालिका आयुक्तांनी २०१६-१७ मध्ये २०८६ कोटींचे उत्पन्न प्रस्तावित केले होते. महासभेने त्यात वाढ करुन ते २१९५ कोटींचे केले होते. परंतु, सुधारीत अंदाजपत्रक बनवितांना त्यात घट करुन ते २०२७ कोटींवर आणून ठेवले होते. यामध्ये एलबीटी बंद झाल्याने उत्पन्नाचे दिलेले लक्ष्य गाठता येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार आयुक्तांनी वसुलीसाठी विविध योजना हाती घेतल्या होत्या. त्यात त्यांना काही अंशी का होईना यश आल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या करातून पालिकेच्या तिजोरीत २०७२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी ३१ मार्च पर्यंत पालिकेच्या तिजोरीत १८१६ कोटींचे उत्पन्न पडले होते. परंतु यंदा मात्र त्यात तब्बल २५६ कोटींची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान मालमत्ता कर विभागाला यंदा ४५६ कोटींची लक्ष दिले असतांना या विभागाने ३१ मार्च अखेर ३८०.५१ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी ती ३४५ कोटी एवढी होती. त्यात ३६ कोटींची वाढ झाली आहे. तर स्थानिक संस्था कर बंद झाला असला तरी, मागील वर्षीच्या तुलनेत या विभागामार्फत ८.५७ कोटींची जास्तीची वसुली झाली आहे. मागील वर्षी ६३५ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र ६४३ कोटी पालिकेने वसूल केले आहेत. तर शासनाकडून मिळणारे अनुदान देखील यंदा ३८३ कोटी मिळाले आहेत.दुसरीकडे शहर विकास विभागाने देखील मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १८३ कोटी अधिक वसूल केले आहेत. मागील वर्षी या विभागाने ४८४ कोटींची वसुली केली होती. यंदा ती ६८८ कोटींवर गेली आहे. (प्रतिनिधी) पाणीपुरवठ्याच्या वसुलीवर परिणामसार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पिछाडीवर पडला आहे. मागील वर्षी या विभागाने १२७ कोटींची वसुली केली होती. यंदा ती केवळ १०६ कोटीच झाली आहे. जाहिरात विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत जास्तीची वसुली केली आहे.पाणीपुरवठ्याच्या वसुलीवर चांगलाच परिणाम झाला. मागील वर्षी या विभागाने १०७ कोटींची वसुली केली होती. यंदा १०२ कोटींवरच समाधान मानावे लागले आहे.