शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचा प्रश्न योग्य, हे सगळं ठरवून चाललंय; संजय राऊतांना 'तो' मुद्दा 'मनसे' पटतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:01 IST

Sanjay Raut on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील साधा माणूस आहे. हे सगळे ठरवून चालले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी नवी मुंबई येथे शक्तिप्रदर्शन केले. यानंतर मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि विजय गुलाल उधळत मराठा बांधव परतले. यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एका मुद्द्याला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा!, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. यावर संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना भाष्य केले.

राज ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे, मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत

सरकारने अध्यादेश काढला पण खरच आरक्षण मिळाले आहे का अशी अनेकांना शंका  आहे. राज ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे. मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत. मनोज जरांगे पाटील साधा माणूस आहे.  मंत्रिमंडळात मतभेद स्पष्ट दिसतात. छगन भुजबळ वेगळी तर देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेतात. मुख्यमंत्र्याची भूमिका ही सरकारची असायला हवी. मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात. हे सगळे ठरवून चालले आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचे आम्ही ओबीसींच्या बाजूने बोलणार. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असते मंत्री विरोधात भूमिका घेत असेल तर सरकार बरखास्तीची शिफारस हवी. तसे होत नाही म्हणजे त्यांची मिलीभगत आहे. हे केंद्राच्या हातातील अधिकार आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरे