शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

युती तुटण्यावर CM फडणवीसांचा दावा, राऊतांचे थेट भाष्य; म्हणाले, “प्रामाणिकपणे सांगतो की...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:44 IST

Sanjay Raut News: केवळ चार जागांच्या वादामुळे युती तुटल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर संजय राऊतांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

Sanjay Raut News: आताच्या घडीला राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. बीड, परभणी, औरंजेबची कबर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबतची विधाने, दिशा सालियन प्रकरण, नागपूर हिंसाचार, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच गौप्यस्फोटांची मालिकाही सुरूच आहे. भाजपा आणि शिवसेना या पक्षांची युती तुटण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शब्दांत भाष्य केले आहे. 

दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना या पक्षांची युती तुटली आणि नवी समीकरणे राज्याच्या राजकारणात उदयास आली. अशातच भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गौप्यस्फोट करत केवळ चार जागांच्या वादामुळे युती तुटल्याचा दावा केला आहे. यानंतर संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली.

भाजपाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, २०१४ साली भाजपाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते. त्यांना युती तोडायची होती. ते तसे ठरवूनच आले होते. इथे केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा हयात नव्हते. याचा फायदा घ्यावा आणि शिवसेना संपवावी, असा भाजपाचा हेतू होता. १४७ व १५१ जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा चालू होती. मी प्रामाणिकपणे सांगतो की, देवेंद्र फडणवीस हे तेव्हा युती तोडण्याच्या विरोधात होते. मात्र भाजपाच्या वरिष्ठांनीच युती तोडली, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, २०१४ साली आमचा तेव्हाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत चर्चा सुरू होती. आम्ही त्यांना आमच्यापेक्षा जास्त जागा देण्यास तयार झालो होतो. पण त्यांनी मनात एक आकडा ठरवला होता. आम्ही त्यांना १४७ जागा द्यायला तयार झालो होतो, आम्ही १२७ जागा लढवणार होतो आणि इतर जागा अन्य मित्रपक्षांना द्यायच्या होत्या. पण ते १५१ जागांवर अडून राहिले. त्यानंतर आम्ही ठरवले की, १४७-१२७ हा फॉर्म्युला मान्य असेल तरच शिवसेनेसोबत युती करायची. हा फॉर्म्युला मान्य असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, अन्यथा युती होऊ शकणार नाही, असा अल्टिमेटम आम्ही शिवसेनेला दिला होता. तुमचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल, असेही सांगितले होते. पण विधात्याच्या मनात मला मुख्यमंत्री करण्याचे असेल. शिवसेनेने सांगितले की, आमच्या युवराजांनी १५१ जागांची घोषणा केली. शिवसेना तेव्हा कौरवांच्या मूडमध्ये होती की आम्ही पाच गावेही देणार नाहीत. ते कौरवांच्या भूमिकेत गेल्यानंतर आम्हीही सांगितले की आमच्याकडेही श्रीकृष्ण आहेत, आम्हीही लढाई लढू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस