शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

देशात सर्वोच्च सोहळा होणार, त्यात राष्ट्रपतींना डावलणार?; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 11:56 IST

देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर विषय आहे. राहुल गांधी यांच्या मुद्द्यांशी मी सहमत आहे असं राऊत म्हणाले.

मुंबई - संसद भवनाचे उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्तेच व्हायला पाहिजे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष नंतर येतात प्रत्येक गोष्टीत निवडणुकीसाठी राजकारण करायचं फक्त आम्ही आणि आम्हीच मी आणि मीच हा मीपणाचा कहर आहे. नव्या संसदेच्या उद्धाटनाला राष्ट्रपती नसतील तर ही गंभीर बाब नसून हास्यास्पद आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर विषय आहे. राहुल गांधी यांच्या मुद्द्यांशी मी सहमत आहे. सेंट्रल व्हिस्टाची अजिबात गरजच नव्हती. आपल्या संसदेपेक्षा जुन्या इमारती इटली आणि इतर ठिकाणी आहेत. राजकीय हव्यासा पोटी आणि हा इतिहास आम्ही घडवला, मी दिल्ली नवीन घडवली त्यासाठी लाखो रुपये आणि जनतेच्या पैशाचा चिरोडा करून आणि राष्ट्रपतींना डावललं जातंय त्याचे उद्धाटन होत आहे. हा या सर्वोच्च पदाचा अपमान आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत गेल्या ९ वर्षात अशा व्यक्तीला बसवलं गेलंय, जी काहीच बोलणार नाही. कोणीही जाब विचारले जाणार नाही असे दोन कालखंडामध्ये राष्टपती बसवले गेले. सोहळ्याला विरोधकांनी बहिष्कार करायचा ठरवला तर आम्ही त्या मध्ये सहभागी होऊ. संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे. देशातला सर्वोच्च सोहळा होणार आहे त्यात राष्ट्रपतींना डावलणार? निवडणुका आल्या की आदिवासींचा मुद्दा पुढे करणार. भाजपा २४ तास ३६५ दिवस केवळ राजकारण आणि निवडणुकांचा विचार करतं. हा निवडणुकांनी ग्रासलेला पक्ष असून देशातील समस्यांशी यांचं काही देणघेण नाही अशी टीकाही राऊतांनी भाजपावर केली. 

मविआ नेते जयंत पाटलांच्या पाठिशीआमच्या सोबत नाही आलात तर ईडीचा त्रास देऊ. जयंत पाटलांच्या बाबतीतही तेच होतंय. महाविकास आघाडी जयंत पाटलांच्या पाठीशी आहे. आम्ही अन्यायाविरोधात लढू. या देशात लोकशाही आहे कुठे केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असे काही लोक आहे ते तुमच्या पुढे झुकणार नाही. प्रत्येक घटक पक्ष हा जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे असंही राऊतांनी म्हटलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी