शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
5
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
6
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
7
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
8
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
9
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
10
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
11
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
12
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
13
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
14
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
15
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा
16
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
17
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
18
जागतिक IVF दिन: IVF हा जोडप्यांसाठी आशेचा किरण; पण 'या' चुकांमुळे पदरी पडते निराशा!
19
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
20
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?

“तहव्वूर राणाला अमेरिकेने देऊन टाकले, हिंमत असेल तर दाऊदला आणा”; संजय राऊतांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:56 IST

Sanjay Raut On Tahawwur Rana Extradition To India: बिहार निवडणुका होईपर्यंत तहव्वूर राणा फेस्टिव्हल सुरू राहील. राणाला आणण्यात यांचे कर्तृत्व काय? एवढीच हिंमत असेल तर पाकिस्तानात घुसून कुलभूषण जाधवांना परत घेऊन या, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut On Tahawwur Rana Extradition To India: तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी काँग्रेसच्या कार्यकाळापासून प्रयत्न सुरू होते. याबाबत यांना माहिती नसेल. तेव्हापासून न्यायालयीन लढाई सुरू होती. त्यानंतर आता १६ वर्षांनी हे प्रत्यार्पण झाले आहे. या हल्ल्याच्या मागे पाकिस्तानचा होता हे सगळ्यांना माहिती आहे, यात नवीन गोष्ट कोणती आहे. पुलवामा हल्ल्याबाबत यांनी सखोल चौकशी करायला हवी होती. तहव्वूर राणाला आणाल, तसेच काँग्रेसच्या कार्यकाळात अबू सालेमला आणले होते. राणाला भारतात आणले यात विशेष असे काहीच नाही. परंतु, यांना याचा फेस्टिव्हल करायचा आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, जर तुमच्यात एवढीच हिंमत आहे, तर नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, पाकिस्तानच्या जेलमध्ये कुलभूषण जाधव सडत आहे, त्यांना सोडवून आणा आणि त्यानंतरच राणाला भारतात आणल्याबाबत उत्सव साजरे करा. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणल्यास त्याचे आम्ही स्वागतच करू, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. 

तहव्वूर राणाला अमेरिकेने देऊन टाकले, हिंमत असेल तर दाऊदला आणा

आमचे सरकार येईल, तेव्हा पाकिस्तानात जाऊन कारवाई करू, असे सांगत होते. परंतु, आतापर्यंत असे घुसून कोणावर कारवाई केली, याची माहिती द्यावी. हिंमत असेल तर आधी दाऊदला आणा,  राणाला तर अमेरिकेने देऊन टाकले आहे. त्यात तुमची मर्दानगी काही नाही. न्यायालयीन लढाई लढली गेली, जी काँग्रेस काळापासून सुरू होती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बिहार निवडणुका होईपर्यंत तहव्वूर राणा फेस्टिव्हल सुरू राहील. राणाला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची बाजी लावून कसाबला पकडले होते. कसाबला फाशी झाली. राणालाही नक्की फाशीची शिक्षा होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान,  २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणले गेले आहे. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली. अखेरीस तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले. आता राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.

 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकार