शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

“बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार”; संजय राऊतांचे थेट भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 16:07 IST

Maharashtra Politics: बारामतीत लोकसभेला सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांसंदर्भात चाचपणी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकार आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्यात अटी-तटीचा सामना पाहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. यातच बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले असले तरी सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून तर्क-वितर्क लढवले जात असताना, बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच विजयी होणार, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोण लढवणार, यावरून चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे याच बारामतीमधून लढणार असल्याचे म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडी अन्य ठिकाणच्या जागावाटपाबाबत चर्चा करून निर्णय घेईल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले होते. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री बारामतीचा दौरा करत असल्याचेही दिसत आहे. यातच संजय राऊत यांनी बारामतीतील लढतीविषयी भाष्य केले आहे. ते मीडियाशी बोलत होते.

बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार

बारामतीत लोकसभेला नणंद विरूद्ध भावजय असा सामना होणार असल्याची चर्चा होत आहे. यावर बोलताना, मला वाटत नाही, असा सामना बारामतीत होईल. या सगळ्या अफवा सुरू आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळते. आम्ही सुद्धा राज्य केले आहे. आम्हाला पवार कुटुंब माहिती आहे आणि बारामतीचे राजकारणही माहिती आहे. कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, राज्यात जेव्हा दुष्काळ होता, तेव्हा तुम्ही सरकारी निवासस्थानी काय करत होतात? सिने कलाकारांसोबत उत्सव साजरे करत होतात. दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असावे याचा नैतिक भान असायला हवे. महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जनतेचे दुःख हरण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्यांनी तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला नागपूरमध्ये जाऊन लोकांचे दुःख जाणून घ्यायला हवे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतlok sabhaलोकसभाSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळे