शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

“बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार”; संजय राऊतांचे थेट भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 16:07 IST

Maharashtra Politics: बारामतीत लोकसभेला सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांसंदर्भात चाचपणी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकार आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्यात अटी-तटीचा सामना पाहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. यातच बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले असले तरी सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून तर्क-वितर्क लढवले जात असताना, बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच विजयी होणार, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोण लढवणार, यावरून चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे याच बारामतीमधून लढणार असल्याचे म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडी अन्य ठिकाणच्या जागावाटपाबाबत चर्चा करून निर्णय घेईल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले होते. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री बारामतीचा दौरा करत असल्याचेही दिसत आहे. यातच संजय राऊत यांनी बारामतीतील लढतीविषयी भाष्य केले आहे. ते मीडियाशी बोलत होते.

बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार

बारामतीत लोकसभेला नणंद विरूद्ध भावजय असा सामना होणार असल्याची चर्चा होत आहे. यावर बोलताना, मला वाटत नाही, असा सामना बारामतीत होईल. या सगळ्या अफवा सुरू आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळते. आम्ही सुद्धा राज्य केले आहे. आम्हाला पवार कुटुंब माहिती आहे आणि बारामतीचे राजकारणही माहिती आहे. कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, राज्यात जेव्हा दुष्काळ होता, तेव्हा तुम्ही सरकारी निवासस्थानी काय करत होतात? सिने कलाकारांसोबत उत्सव साजरे करत होतात. दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असावे याचा नैतिक भान असायला हवे. महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जनतेचे दुःख हरण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्यांनी तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला नागपूरमध्ये जाऊन लोकांचे दुःख जाणून घ्यायला हवे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतlok sabhaलोकसभाSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळे