शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

“बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार”; संजय राऊतांचे थेट भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 16:07 IST

Maharashtra Politics: बारामतीत लोकसभेला सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांसंदर्भात चाचपणी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकार आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्यात अटी-तटीचा सामना पाहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. यातच बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले असले तरी सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून तर्क-वितर्क लढवले जात असताना, बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच विजयी होणार, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोण लढवणार, यावरून चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे याच बारामतीमधून लढणार असल्याचे म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडी अन्य ठिकाणच्या जागावाटपाबाबत चर्चा करून निर्णय घेईल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले होते. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री बारामतीचा दौरा करत असल्याचेही दिसत आहे. यातच संजय राऊत यांनी बारामतीतील लढतीविषयी भाष्य केले आहे. ते मीडियाशी बोलत होते.

बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार

बारामतीत लोकसभेला नणंद विरूद्ध भावजय असा सामना होणार असल्याची चर्चा होत आहे. यावर बोलताना, मला वाटत नाही, असा सामना बारामतीत होईल. या सगळ्या अफवा सुरू आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळते. आम्ही सुद्धा राज्य केले आहे. आम्हाला पवार कुटुंब माहिती आहे आणि बारामतीचे राजकारणही माहिती आहे. कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, राज्यात जेव्हा दुष्काळ होता, तेव्हा तुम्ही सरकारी निवासस्थानी काय करत होतात? सिने कलाकारांसोबत उत्सव साजरे करत होतात. दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असावे याचा नैतिक भान असायला हवे. महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जनतेचे दुःख हरण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्यांनी तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला नागपूरमध्ये जाऊन लोकांचे दुःख जाणून घ्यायला हवे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतlok sabhaलोकसभाSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळे