शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

“बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार”; संजय राऊतांचे थेट भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 16:07 IST

Maharashtra Politics: बारामतीत लोकसभेला सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांसंदर्भात चाचपणी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकार आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्यात अटी-तटीचा सामना पाहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. यातच बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले असले तरी सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून तर्क-वितर्क लढवले जात असताना, बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच विजयी होणार, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोण लढवणार, यावरून चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे याच बारामतीमधून लढणार असल्याचे म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडी अन्य ठिकाणच्या जागावाटपाबाबत चर्चा करून निर्णय घेईल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले होते. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री बारामतीचा दौरा करत असल्याचेही दिसत आहे. यातच संजय राऊत यांनी बारामतीतील लढतीविषयी भाष्य केले आहे. ते मीडियाशी बोलत होते.

बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार

बारामतीत लोकसभेला नणंद विरूद्ध भावजय असा सामना होणार असल्याची चर्चा होत आहे. यावर बोलताना, मला वाटत नाही, असा सामना बारामतीत होईल. या सगळ्या अफवा सुरू आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळते. आम्ही सुद्धा राज्य केले आहे. आम्हाला पवार कुटुंब माहिती आहे आणि बारामतीचे राजकारणही माहिती आहे. कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, राज्यात जेव्हा दुष्काळ होता, तेव्हा तुम्ही सरकारी निवासस्थानी काय करत होतात? सिने कलाकारांसोबत उत्सव साजरे करत होतात. दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असावे याचा नैतिक भान असायला हवे. महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जनतेचे दुःख हरण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्यांनी तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला नागपूरमध्ये जाऊन लोकांचे दुःख जाणून घ्यायला हवे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतlok sabhaलोकसभाSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळे