शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

“आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याबाजूने लागेल अशी अपेक्षाच नाही, कारण...”: अरविंद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 10:39 IST

Mla Disqualification Case Result: ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

Mla Disqualification Case Result: अवघ्या काही तासांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाचे वाचन करणार आहेत. मात्र त्यापूर्वी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर शाब्दिक हल्ले करणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, अशी अपेक्षा नाही, असे विधान केले आहे. 

मीडियाशी बोलताना अरविंद सावंत यांनी केलेल्या अशा विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बोलले जात आहे. आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याबाजूने लागेल अशी अपेक्षाच नाही. कारण विकाऊ, लाचार लोक बसलेले आहेत. लाचारांकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा बाळगणे, मुर्खपणाचे लक्षण ठरेल, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. 

ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल

अध्यक्ष हे सरड्याप्रमाणे रंग बदलत आहेत. त्यांनी तीनवेळा आपला रंग बदलला आहे. ते काय न्याय देणार? ज्यांनी न्याय द्यायचा, ते आरोपीला जाऊन भेटतात. सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लवाद म्हणून नेमले आहे. असे असून तुम्ही आरोपीच्या घरी कसे जाता, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. जर निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. अपात्रता प्रकरणाचा निकाल काही येऊ द्यात. जनता यांना यांची जागा दाखवणार. खरे आपत्र कोण हे जनतेच्या न्यायालयात कळेल, या शब्दांत अरविंद सावंत यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली म्हणजे आकाश कोसळले, असे मानण्याचे कारण काय? आपली बाजू लंगडी आहे असे वाटते त्यांनी मतप्रदर्शन करून खोटी सहानुभूती मिळवणे बंद करावे, अशी टीका शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसेच विधानसभा अध्यक्षांनी आरोपींना भेटणे चुकीचे आहे, असे भाष्य उद्धव ठाकरेंनी करणे चुकीचे आहे. या भेटीत कोणतीही लपवाछपवी नाही. ज्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे, त्यांच्यावर दुसरा व्हिप लागू होत नाही. ज्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे, त्यांना कोणत्याही पक्षात विलीन होण्याची गरज नाही. ठाकरे गटाचे अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहेत, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv Senaशिवसेना