शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“शिवसेना अन् ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, आमची मशाल...”; अनिल परब स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 11:16 IST

Shiv Sena Thackeray Group News: या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला.

Shiv Sena Thackeray Group News: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय ठाकरे गटाकडे असल्याचे सांगितले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिवसेना आणि ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. 

भरत गोगावलेंचा व्हीप आम्हाला मंजूर करायची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला तर आम्हाला वेगळ्या पक्षाची नोंदणी करण्याचा अधिकार आहे. आम्हाला अपात्र ठरवण्यात आलेले नाही. त्यांच्या लेखी पक्षविरोधी कारवाई आम्ही केली मग आम्हाला त्यांनी अपात्र का ठरवले नाही? असा सवाल अनिल परब यांनी केला. जे काही नार्वेकर बोलले तो ड्राफ्ट लिहून आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलो आहोतच. त्यांनी व्हीप बजावावा आम्ही तो व्हीप मान्य करणार नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते ते पाहू, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. 

आमची मशाल आता सगळीकडे धगधगतेय, त्याचाच त्यांना त्रास होतोय

आमची मशाल आता सगळीकडे धगधगत आहे. त्याचाच त्यांना त्रास होत आहे. या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल. कित्येक लोकांनी बाळासाहेबांना पाहिले नाही, ते म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. या लोकांना काही अडचण होती, तर मविआचे सरकार स्थापन करतानाच त्यांनी सांगायला हवे होते. मंत्रीपद नाकारायला हवे होते. मंत्रिमंडळात यायचे नव्हते. आम्ही पण यातून गेलो होतो, काय दवाब टाकला जातो हे आम्हालाही माहिती आहे, या शब्दांत अनिल परब यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

दरम्यान, शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाही. शिवसनेचे सगळे चांगले वाईट दिवस आम्ही बघितले आहोत. त्यामुळे जर हे आम्हाला सांगत असतील की बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत, त्यांना जर काही अडचण होती, तर तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. आम्ही सैनिक आहोत, पक्षाच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतला, तो आम्ही मान्य करतो, त्यावर आम्ही प्रश्न विचारत नाही, असे अनिल परब यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAnil Parabअनिल परब