शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

“शिवसेना अन् ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, आमची मशाल...”; अनिल परब स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 11:16 IST

Shiv Sena Thackeray Group News: या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला.

Shiv Sena Thackeray Group News: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय ठाकरे गटाकडे असल्याचे सांगितले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिवसेना आणि ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. 

भरत गोगावलेंचा व्हीप आम्हाला मंजूर करायची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला तर आम्हाला वेगळ्या पक्षाची नोंदणी करण्याचा अधिकार आहे. आम्हाला अपात्र ठरवण्यात आलेले नाही. त्यांच्या लेखी पक्षविरोधी कारवाई आम्ही केली मग आम्हाला त्यांनी अपात्र का ठरवले नाही? असा सवाल अनिल परब यांनी केला. जे काही नार्वेकर बोलले तो ड्राफ्ट लिहून आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलो आहोतच. त्यांनी व्हीप बजावावा आम्ही तो व्हीप मान्य करणार नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते ते पाहू, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. 

आमची मशाल आता सगळीकडे धगधगतेय, त्याचाच त्यांना त्रास होतोय

आमची मशाल आता सगळीकडे धगधगत आहे. त्याचाच त्यांना त्रास होत आहे. या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल. कित्येक लोकांनी बाळासाहेबांना पाहिले नाही, ते म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. या लोकांना काही अडचण होती, तर मविआचे सरकार स्थापन करतानाच त्यांनी सांगायला हवे होते. मंत्रीपद नाकारायला हवे होते. मंत्रिमंडळात यायचे नव्हते. आम्ही पण यातून गेलो होतो, काय दवाब टाकला जातो हे आम्हालाही माहिती आहे, या शब्दांत अनिल परब यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

दरम्यान, शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाही. शिवसनेचे सगळे चांगले वाईट दिवस आम्ही बघितले आहोत. त्यामुळे जर हे आम्हाला सांगत असतील की बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत, त्यांना जर काही अडचण होती, तर तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. आम्ही सैनिक आहोत, पक्षाच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतला, तो आम्ही मान्य करतो, त्यावर आम्ही प्रश्न विचारत नाही, असे अनिल परब यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAnil Parabअनिल परब