शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

“शिवसेना अन् ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, आमची मशाल...”; अनिल परब स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 11:16 IST

Shiv Sena Thackeray Group News: या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला.

Shiv Sena Thackeray Group News: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय ठाकरे गटाकडे असल्याचे सांगितले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिवसेना आणि ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. 

भरत गोगावलेंचा व्हीप आम्हाला मंजूर करायची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला तर आम्हाला वेगळ्या पक्षाची नोंदणी करण्याचा अधिकार आहे. आम्हाला अपात्र ठरवण्यात आलेले नाही. त्यांच्या लेखी पक्षविरोधी कारवाई आम्ही केली मग आम्हाला त्यांनी अपात्र का ठरवले नाही? असा सवाल अनिल परब यांनी केला. जे काही नार्वेकर बोलले तो ड्राफ्ट लिहून आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलो आहोतच. त्यांनी व्हीप बजावावा आम्ही तो व्हीप मान्य करणार नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते ते पाहू, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. 

आमची मशाल आता सगळीकडे धगधगतेय, त्याचाच त्यांना त्रास होतोय

आमची मशाल आता सगळीकडे धगधगत आहे. त्याचाच त्यांना त्रास होत आहे. या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल. कित्येक लोकांनी बाळासाहेबांना पाहिले नाही, ते म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. या लोकांना काही अडचण होती, तर मविआचे सरकार स्थापन करतानाच त्यांनी सांगायला हवे होते. मंत्रीपद नाकारायला हवे होते. मंत्रिमंडळात यायचे नव्हते. आम्ही पण यातून गेलो होतो, काय दवाब टाकला जातो हे आम्हालाही माहिती आहे, या शब्दांत अनिल परब यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

दरम्यान, शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाही. शिवसनेचे सगळे चांगले वाईट दिवस आम्ही बघितले आहोत. त्यामुळे जर हे आम्हाला सांगत असतील की बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत, त्यांना जर काही अडचण होती, तर तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. आम्ही सैनिक आहोत, पक्षाच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतला, तो आम्ही मान्य करतो, त्यावर आम्ही प्रश्न विचारत नाही, असे अनिल परब यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAnil Parabअनिल परब