शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

राहुल गांधींना दिलासा; आदित्य ठाकरेंचे थेट भाष्य, म्हणाले, “केंद्रात बसलेल्या सरकारला...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 17:08 IST

Aaditya Thackeray: सत्यासाठी आम्ही लढत राहू शांत बसणार नाही, असा एल्गार आदित्य ठाकरे यांनी केला.

Aaditya Thackeray: मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने जी शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकीही परत मिळणार आहे. यावर, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. 

सत्यमेव जयते! कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही. राहुल गांधी यांच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे, हे दिसून आले. चुकीच्या पद्धतीने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. राहुल गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही यावर भाष्य केले.

सत्यासाठी आम्ही लढत राहू शांत बसणार नाही

राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दिलासा योग्यच आहे. कारण आपल्या देशात कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. या प्रकरणात कुठे तरी काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या हे माझेच म्हणणे नाही तर हे प्रत्येकाला वाटत होते. सत्यासह उभे राहणे हे आता या देशात गुन्हा ठरु लागले आहे. म्हणजे केंद्रात बसलेल्या सरकारला तसे वाटते आहे. पण आम्ही सत्यासाठी आम्ही लढत राहू शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

दरम्यान, मोदी आडनाव बदनामीच्या खटल्यात गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायलायने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधींचा संसदेत परतण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही. राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य योग्य नव्हते, सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगले पाहिजे, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींचे कान टोचलेत.

 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीAditya Thackreyआदित्य ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय