शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

सोलापूर जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद

By appasaheb.patil | Updated: August 9, 2019 11:57 IST

महावितरण : पुरामुळे नादुरुस्त वीज मीटर स्वखर्चाने बदलणार

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील काही भागातील पूरस्थितीमुळे १३१ वीज वाहिन्यांच्या वीज पुरवठ्यावर अंशत: परिणाम झालाधोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला

सोलापूर : ज्या ठिकाणी पुरामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीज मीटर नादुरुस्त झाले आहेत, अशा वीज ग्राहकांचे वीज मीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील काही भागातील पूरस्थितीमुळे १३१ वीज वाहिन्यांच्या वीज पुरवठ्यावर अंशत: परिणाम झाला असून, धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागातील २२ व ग्रामीण भागातील १९३६ असे एकूण १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा पुराच्या पाण्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रामुख्याने कृषी पंपधारकांसह सुमारे २१ हजार ९०० ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे. पुराच्या पाण्याचा धोका निवळताच या रोहित्रांचा वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.

अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीज मीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीज मीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देणार आहे. वीज मीटर बदलण्याचे काम त्या-त्या भागातील पूरस्थिती निवळताच करण्यात येईल. पावसामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती असून, पावसाचे पाणी साचल्यामुळे वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येतो. या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सुरक्षेसाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून, पाणी कमी झाल्यास पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल़ या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडळ

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरfloodपूरmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन