शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सोलापूर जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद

By appasaheb.patil | Updated: August 9, 2019 11:57 IST

महावितरण : पुरामुळे नादुरुस्त वीज मीटर स्वखर्चाने बदलणार

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील काही भागातील पूरस्थितीमुळे १३१ वीज वाहिन्यांच्या वीज पुरवठ्यावर अंशत: परिणाम झालाधोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला

सोलापूर : ज्या ठिकाणी पुरामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीज मीटर नादुरुस्त झाले आहेत, अशा वीज ग्राहकांचे वीज मीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील काही भागातील पूरस्थितीमुळे १३१ वीज वाहिन्यांच्या वीज पुरवठ्यावर अंशत: परिणाम झाला असून, धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागातील २२ व ग्रामीण भागातील १९३६ असे एकूण १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा पुराच्या पाण्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रामुख्याने कृषी पंपधारकांसह सुमारे २१ हजार ९०० ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे. पुराच्या पाण्याचा धोका निवळताच या रोहित्रांचा वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.

अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीज मीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीज मीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देणार आहे. वीज मीटर बदलण्याचे काम त्या-त्या भागातील पूरस्थिती निवळताच करण्यात येईल. पावसामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती असून, पावसाचे पाणी साचल्यामुळे वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येतो. या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सुरक्षेसाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून, पाणी कमी झाल्यास पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल़ या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडळ

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरfloodपूरmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन