शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आमदारांची नावे सांगा, पाठवून देतो! एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेला आव्हान, प्रथमच आले हॉटेलबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 08:12 IST

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांकडून १५ ते २० बंडखोर आमदार संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत.

मुंबई : गुवाहाटीतील आमदार कोणाच्या तरी संपर्कात असल्याचे दावे खोटे आहेत. स्वार्थासाठी नव्हे तर हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी सर्व आमदार इथे आले आहेत. संपर्कात असल्याचे दावे करण्यापेक्षा नावे सांगा, त्यांना पाठवून देऊ, अशा शब्दांत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंंदे यांनी मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले.मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांकडून १५ ते २० बंडखोर आमदार संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर स्वत: शिंदे यांनी मंगळवारी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन ब्लूच्या प्रांगणात प्रथमच येत माध्यमांशी संवाद साधला. आम्ही सगळे एक आहोत. कोणीही ठाकरे यांच्या संपर्कात नाही. त्यांच्या संपर्कात कुणी असेल तर त्यांनी नावे सांगावीत, असे आव्हान शिंदे यांनी दिले. 

किती वेळा हात जोडायचे - केसरकरबंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, २०-२१ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे उगाच सांगू नका. एक-दोन लोकांची नावे सांगा, त्यांनाही मुंबईत आणून पोहोचवतो. आम्ही मांडलेली भूमिका शिवसेनेच्या हिताची आहे. किती वेळा हात जोडायचे यालाही मर्यादा आहेत.

आम्हाला गद्दार म्हणण्याचा एकाही शिवसैनिकाला अधिकार नाही. आम्हाला कुणी गद्दार म्हणायला लागले. डुक्कर, मेलेली प्रेत, घाण, पिकलेली पानं म्हणायला लागले, तर ते कोण सहन करणार?, असा प्रश्न उपस्थित करत दीपक केसरकर यांनी आणखी किती सहन करायचे असा प्रतिप्रश्न केला. 

आदित्य यांच्या तोंडी राऊतांची भाषा शोभत नाही. आदित्य ठाकरे सुशिक्षित आहेत. त्यांच्याकडे आम्ही आशेने पाहतो. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून संयमित भाषा शिकावी. त्यांच्या तोंडी संजय राऊत यांची भाषा शोभत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

फडणवीस यांनी या डबक्यात उतरू नये - संजय राऊत- ज्या प्रकारचे डबके सध्या राजकारणात झाले आहे त्यात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने उतरू नये. या डबक्यात उतरून त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या पक्षाची, पंतप्रधान मोदींची आणि देवेंद्र फडणवीस यांची कमालीची अप्रतिष्ठा होईल, असे माझे स्पष्ट आणि परखड मत आहे. मला खात्री आहेत ते या डबक्यात उडी मारणार नाहीत, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी माध्यमांना सांगितले.

- शिंदे यांच्या बंडानंतर सुरू झालेली राजकीय घडामोड, ईडीने पाठविलेली नोटीस या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राजकीय टोलेबाजी चालूच ठेवली आहे. सध्या राजकीय वातावरणात बदल सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्याकडे ११६ आमदारांचे बळ आहे. हा विरोधी पक्ष विधायक काम करुन महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. 

- फडणवीस यांच्याकडे ती क्षमता आहे. पण त्यांनी या डबक्यात उतरू नये, असा एक मित्र म्हणून माझा सल्ला आहे, असे राऊत म्हणाले. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आसामचे वातावरण एन्जॉय करण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे ११ जुलैपर्यंत त्यांना आसाममध्ये आराम करायचा आहे. त्यांचे महाराष्ट्रात काही काम नाही, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे