शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

राज्यातील सर्व शाळांमधील गुणवत्तेनुसार शिक्षक भरती केवळ फार्स ठरणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 13:46 IST

गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरतीचा करणार असल्याचा शासनाकडून केला जात असलेला दावा पूर्णपणे फोल ठरला असल्याची भावना पात्रताधारक उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदहा जणांमधून संस्थाचालकच करणार निवडशासनाला करता येणार नाही हस्तक्षेपयोग्यप्रकारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवित आहेत ना यावर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक

पुणे : राज्यभरातील सर्व शाळांमधील शिक्षक भरती ही अभियोग्यता चाचणीव्दारे गुणवत्तेनुसार होणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अचानक त्यामध्ये बदल करून खासगी संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये दहा उमेदवारांमधून एक शिक्षक निवडण्याची मुभा शिक्षण संस्था चालकांना देण्यात आली आहे. यामुळे शिक्षक भरतीसाठी पुन्हा एकदा घोडेबाजार भरवून शिक्षक भरतीसाठी लाखो रूपयांचे डोनेशन घेण्याचा संस्थाचालकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीचा शासनाचा निर्णय केवळ फार्स ठरणार आहे.  शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा सुधारित अध्यादेश शासनातर्फे गुरूवारी काढण्यात आला. यामध्ये भरती प्रक्रियेतील या नवीन बदलांची घोषणा करण्यात आली आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक भरतीमध्ये शासनाला कुठलाही हस्तक्षेप करता येणार नसल्याचे स्पष्ट करून राज्य शासनाने आपले हात झटकले आहेत. त्यामुळे अभियोग्यता चाचणीत मिळालेल्या गुणांनुसार आपल्याला लगेच नोकरी मिळणार या आशेवर बसलेल्या हजारो पात्रताधारक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांच्या एका रिक्त जागेसाठी दहा उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. ही मुलाखत ३० गुणांची असणार असून या मुलाखतीमीधल गुणांच्याआधारे संस्थाचालकांकडून शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य शासनाने गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यासाठी डी.एड. व बीएड झालेल्या उमेदवारांची २०० गुणांची अभियोग्यता चाचणी घेतली. या चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड होईल असे जाहीर केले होते. मात्र शासनाने केलेल्या भरती प्रक्रियेतील नवीन दुरूस्तीमुळे त्याचा मुळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.  संस्थाचालकांना त्यांच्या मर्जीतील उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड करता येईल तसेच शिक्षक भरती करताना लाखो रूपयांचे डोनेशन पूर्ववत घेता येईल अशी तरतुद या नवीन दुरूस्तीमुळे करण्यात आल्याची भावना पात्रताधारक शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.  गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरतीचा करणार असल्याचा शासनाकडून केला जात असलेला दावा पूर्णपणे फोल ठरला असल्याची भावना पात्रताधारक उमेदवारांनी व्यक्त केली आहे. शिक्षक भरतीच्या जागा लवकर निघत नसल्याची नाराजी असताना पुन्हा असा निर्णय घेतल्याने त्यांच्यामधील असंतोषामध्ये वाढ झाली आहे.नवीन सुधारणांनुसार महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील भरती मात्र अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे होऊ शकेल ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. .............आता शिक्षक होण्यासाठी वयाची अटशिक्षक भरती प्रक्रियेबाबत केलेल्या सुधारणांच्या अध्यादेशानुसार आता शिक्षक भरतीसाठी वयाची अट लागू करण्यात आली आहे. खुल्या प्रवगार्तील उमेदवार वयाच्या ३८ वर्षांपर्यंतच तर मागास प्रवगार्तील उमेदवार वयाच्या ४३ वर्षांपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. गेल्या ६ वर्षांपासून शिक्षक भरती केली नाही, त्यातच त्यामुळे अनेकांची नोकरीची वय उलटून गेली आहेत. त्यामुळे या अटीबदद्लही पात्रताधारक शिक्षकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

................................

शासनाचे नियंत्रण हवेच होतेखासगी संस्थाच्या शाळांच्या शिक्षक भरती प्रक्रियेचे सर्व अधिकार संस्था चालकांना असतील या प्रक्रियेत राज्य शासनास हस्तक्षेप करता येणार नाही अशी दुरूस्ती गुरूवारी काढलेल्या अध्यादेशात करण्यात आली आहे. वस्तूत: खासगी संस्थाचालक योग्यप्रकारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवित आहेत ना यावर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक होते. मात्र शासनाने हात झटकल्याने पात्रताधारक शिक्षकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकGovernmentसरकार