शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

मुलांना मुलींचा आदर करण्यास आणि योग्य काय- अयोग्य काय शिकवा! ‘बेटा पढाओ, बेटी बचाओ’चा उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 08:09 IST

Mumbai High Court News: ‘पोक्सो’अंतर्गत येणाऱ्या प्रकरणातील मुलींची चाचणी महिला डॉक्टरनेच करावी आणि ही चाचणी करण्यास खासगी रुग्णालये नकार देऊ शकत नाहीत आणि ते पीडितेला पोलिसांकडे जाण्यास सांगू शकत नाहीत, असेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.

 मुंबई - मुलांना योग्य-अयोग्य काय, हे शिकवण्याबरोबरच महिला आणि मुलींचा आदर करण्याचे शिकवणेही गरजेचे आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने ‘बेटा पढाओ, बेटी बचाओ,’ याचा पुनरुच्चार केला. बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचाराबाबत स्वयंप्रेरणेने दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेताना न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली.

‘पोक्सो’अंतर्गत येणाऱ्या प्रकरणातील मुलींची चाचणी महिला डॉक्टरनेच करावी आणि ही चाचणी करण्यास खासगी रुग्णालये नकार देऊ शकत नाहीत आणि ते पीडितेला पोलिसांकडे जाण्यास सांगू शकत नाहीत, असेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. राज्य सरकारने अशा घटना रोखण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळीन्यायालयाला सादर केली.

यावेळी खंडपीठाने ‘पोक्सो’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना आखाव्या लागतील, त्याबाबत सर्वसमावेशक शिफारशी देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीवर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्या. साधना जाधव व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. तसेच समिती सदस्य म्हणून त्यावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांचीही नियुक्ती केली. न्यायालयाने सरकारला बाल कल्याण समितीमधील एका सदस्याचाही या समितीमध्ये समावेश करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या समितीला आठ आठवड्यांत शिफारशी सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले.

बदलापूर गुन्ह्याच्या तपासाबाबत असमाधानघटनेनंतर संबंधित शैक्षणिक संस्थेचे दोन विश्वस्त फरार झाले. त्यांच्या अटकेसाठी एसआयटीने केलेल्या प्रयत्नांवर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. पोलिसांनी केस डायरीत तपासाबाबत नीट नोंद न केल्यानेही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. गेली ३५ वर्षे अशाच पद्धतीने केस डायरी लिहिली जात आहे. या पद्धतीत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने म्हटले.

आरोपपत्र दाखल करण्याची घाई नको    राज्य सरकारने याप्रकरणात काय पावले उचलली आणि काय तपास सुरू आहे, याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने यापुढे काय? असा प्रश्न केला.    तेव्हा महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी आता आरोपपत्र दाखल करू, अशी माहिती दिली. तेव्हा खंडपीठाने ‘लोकांच्या दबावाला बळी पडून आरोपपत्र दाखल करण्याची घाई करू नका. तपास योग्य रीतीने झाला आहे का? याची खात्री करूनच पुढे जा,’ असे सांगितले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट