शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

५७३ कोटींच्या पीक कर्ज वाटपासाठी टीडीसीसी बँकेचे शेतकरी मेळावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:39 IST

खरीप हंगामाकरिता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५७३ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपास मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: खरीप हंगामाकरिता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५७३ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपास मंजुरी दिली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी शेतकरी मेळावे आयाेजित केले जात आहेत. बँकेच्या सर्व शाखांसह प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्तरावर आयोजित शेतकरी मेळाव्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही सहकार क्षेत्रातील महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना शेती कर्ज वाटप मुख्यतः बँकेमार्फत करण्यात येते. एसएलबीसीच्या सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक पत आराखड्यानुसार एकूण खरीप व रब्बी पीक कर्ज वाटपाचे ठाणे जिल्ह्यासाठी ४०४ कोटी ६८ लाख रुपये व पालघर जिल्ह्यासाठी २१६ काेटी २५ लाख रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी टीडीसीसी बँकेस ठाणे जिल्ह्यासाठी ४६ टक्के म्हणजेच १८७ कोटी २८ लाख तर पालघर जिल्ह्यासाठी ४५ टक्के म्हणजे ९८ कोटी ६४ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. 

खरीप हंगाम २०२५-२६ साठी...यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ५७३ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने दोन्ही जिल्ह्यांत शेतकरी मेळावे आयोजित केले, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. यासाठी बँकेने खरीप हंगामासाठी ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी  २९१ कोटी ३३ लाख रुपये व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८१ कोटी ९५ लाख अशी एकूण  ५७३ काेटी २८ लाख रुपये पीक कर्ज वाटपासाठी मंजुरी दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या मंजूर पीक कर्जापैकी १८ जूनपर्यंत ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७९ कोटी ७१ लाख व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  ७० कोटी ७७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे, असेही पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास अनुसरून ठाणे, पालघर जिल्ह्यातील सहकार विभागाचे अधिकारी, बँकेचे अधिकारी, शाखा तपासणीस, सहाय्यक तपासणीस यांची अलीकडेच सभा घेऊन खरीप हंगाम ‘२०२५-२६ खरीप पीक कर्ज’ वाटप नियोजन व आढावा घेण्यात आला. बँकेच्या सर्व शाखा, प्राथमिक कृषि सहकारी संस्था पातळीवर शेतकऱ्यांच्या सभा आयोजित करून त्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज वाटप करून शासनाचे दिलेले उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करण्यासाठी निश्चित केले, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Schemeकृषी योजनाMaharashtraमहाराष्ट्र