शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ रौद्र रूप घेणार; महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 07:20 IST

तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून नैर्ऋत्य दिशेला ३०० किमी पेक्षा कमी अंतरावर आहे.

ठळक मुद्देकिनारपट्टीला लागून असलेल्या गावांमध्ये धोका जास्त असून अनेक गावांमध्ये मोठ्या लाटांमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.गोव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफ तुकड्या दाखलमालवण, देवगड व वेंगुर्ला किनारपट्टी भागात लाटांचे पाणी किनाऱ्यावर घुसले आहे

नवी दिल्ली : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ घोंगावत आहे. चक्रीवादळाची केरळच्या दिशेने वाटचाल सुरू असून त्याच्या प्रभावामुळे केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळाच्या तडाख्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टीवरही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही तासांमध्ये या वादळाची तीव्रता आणखी वाढत आहे. त्यामुळे १४५ किमी प्रति तास एवढ्या वेगाने वादळी वारे वाहतील, असा इशारा देण्यात आला आहे. तौक्ते चक्रीवादळ केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ घोंगावत असून अजस्त्र लाटा समुद्र किनाऱ्यांवर तांडव करत आहेत. केरळमधील थिरुवनंतपुरमपासून कासरगोडपर्यंत शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबियांना घरे सोडून मदत शिबिरात जावे लागले आहे. झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांब कोसळले आहेत. किनारपट्टीला लागून असलेल्या गावांमध्ये धोका जास्त असून अनेक गावांमध्ये मोठ्या लाटांमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.

गोव्यात  एनडीआरएफ तुकड्या दाखलतौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून नैर्ऋत्य दिशेला ३०० किमी पेक्षा कमी अंतरावर आहे. रविवारी ते गोव्यापासून साधारणपणे २८० किलोमीटर अंतरावरून ते उत्तरेकडे सरकरणार आहे. गोव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफ तुकड्या दाखल झाल्या आहेत.

तापमानवाढीचा धोक्याचा इशाराचक्रीवादळाचे अतिशय वेगाने तीव्र स्वरुपात रुपांतर होणे हे वातावरण बदल आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्याचा परिणाम आहे. हा धोक्याचा इशारा असल्याचे भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ रॉक्सी कोल यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर लाटांचे तडाखेमालवण, देवगड व वेंगुर्ला किनारपट्टी भागात लाटांचे पाणी किनाऱ्यावर घुसले आहे. मालवण बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री साडेसात वाजता पाऊस थांबला होता. बंदर जेटी, दांडी, देवबाग, तारकर्ली, तळाशील किनारपट्टी भागात भरतीचे पाणी आत घुसले होते. वेंगुर्ला तालुक्यामध्ये काही ठिकाणी झाडे कोसळल्याने काही घरांचे नुकसान झाले. मांडवी खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रत्नागिरीत ढगांच्या गडगडाटात पाऊसरत्नागिरी जिल्ह्यात किनारपट्टीवरील तालुक्यांसह सर्वत्र दुपारपासून ढगांच्या गडगडाटात पाऊस पडत आहे. समुद्रात लाटांचे स्वरूप वाढले असले तरी अजून धोकादायक झालेले नाही. हे वादळ पहाटे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करील, असा अंदाज आहे.

मुंबईला आज बसणार तडाखाहे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई या जिल्ह्यांना तडाखा बसेल. मुंबईसह लगतच्या जिल्ह्यात वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई पालिकेसह सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आदेश आहेत. वांद्रे-वरळी सी-लिंकही बंद ठेवला आहे.

तौक्ते चक्रीवादळ रात्री गोव्याच्या किनारपट्टीपासून सुमारे अडीचशे किमी अंतरावर होते. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर पोरबंदर आणि नालिया या शहरांजवळ १८ मे रोजी धडकेल. तोपर्यंत ते आणखी तीव्र होण्याची भीती आहे. त्यावेळी ताशी १३० ते १४५ क‍िमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. चक्रीवादळाला तौक्ते हे नाव म्यानमार देशाने दिले आहे. सरड्याच्या एका विशिष्ठ प्रजातीवरून हे नाव देण्यात आले आहे. बोलका सरडा म्हणून या प्रजातीला ओळखले जाते.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ