शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ रौद्र रूप घेणार; महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 07:20 IST

तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून नैर्ऋत्य दिशेला ३०० किमी पेक्षा कमी अंतरावर आहे.

ठळक मुद्देकिनारपट्टीला लागून असलेल्या गावांमध्ये धोका जास्त असून अनेक गावांमध्ये मोठ्या लाटांमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.गोव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफ तुकड्या दाखलमालवण, देवगड व वेंगुर्ला किनारपट्टी भागात लाटांचे पाणी किनाऱ्यावर घुसले आहे

नवी दिल्ली : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ घोंगावत आहे. चक्रीवादळाची केरळच्या दिशेने वाटचाल सुरू असून त्याच्या प्रभावामुळे केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळाच्या तडाख्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टीवरही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या काही तासांमध्ये या वादळाची तीव्रता आणखी वाढत आहे. त्यामुळे १४५ किमी प्रति तास एवढ्या वेगाने वादळी वारे वाहतील, असा इशारा देण्यात आला आहे. तौक्ते चक्रीवादळ केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ घोंगावत असून अजस्त्र लाटा समुद्र किनाऱ्यांवर तांडव करत आहेत. केरळमधील थिरुवनंतपुरमपासून कासरगोडपर्यंत शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबियांना घरे सोडून मदत शिबिरात जावे लागले आहे. झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांब कोसळले आहेत. किनारपट्टीला लागून असलेल्या गावांमध्ये धोका जास्त असून अनेक गावांमध्ये मोठ्या लाटांमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.

गोव्यात  एनडीआरएफ तुकड्या दाखलतौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून नैर्ऋत्य दिशेला ३०० किमी पेक्षा कमी अंतरावर आहे. रविवारी ते गोव्यापासून साधारणपणे २८० किलोमीटर अंतरावरून ते उत्तरेकडे सरकरणार आहे. गोव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफ तुकड्या दाखल झाल्या आहेत.

तापमानवाढीचा धोक्याचा इशाराचक्रीवादळाचे अतिशय वेगाने तीव्र स्वरुपात रुपांतर होणे हे वातावरण बदल आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्याचा परिणाम आहे. हा धोक्याचा इशारा असल्याचे भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ रॉक्सी कोल यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर लाटांचे तडाखेमालवण, देवगड व वेंगुर्ला किनारपट्टी भागात लाटांचे पाणी किनाऱ्यावर घुसले आहे. मालवण बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री साडेसात वाजता पाऊस थांबला होता. बंदर जेटी, दांडी, देवबाग, तारकर्ली, तळाशील किनारपट्टी भागात भरतीचे पाणी आत घुसले होते. वेंगुर्ला तालुक्यामध्ये काही ठिकाणी झाडे कोसळल्याने काही घरांचे नुकसान झाले. मांडवी खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रत्नागिरीत ढगांच्या गडगडाटात पाऊसरत्नागिरी जिल्ह्यात किनारपट्टीवरील तालुक्यांसह सर्वत्र दुपारपासून ढगांच्या गडगडाटात पाऊस पडत आहे. समुद्रात लाटांचे स्वरूप वाढले असले तरी अजून धोकादायक झालेले नाही. हे वादळ पहाटे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करील, असा अंदाज आहे.

मुंबईला आज बसणार तडाखाहे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई या जिल्ह्यांना तडाखा बसेल. मुंबईसह लगतच्या जिल्ह्यात वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई पालिकेसह सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आदेश आहेत. वांद्रे-वरळी सी-लिंकही बंद ठेवला आहे.

तौक्ते चक्रीवादळ रात्री गोव्याच्या किनारपट्टीपासून सुमारे अडीचशे किमी अंतरावर होते. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर पोरबंदर आणि नालिया या शहरांजवळ १८ मे रोजी धडकेल. तोपर्यंत ते आणखी तीव्र होण्याची भीती आहे. त्यावेळी ताशी १३० ते १४५ क‍िमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. चक्रीवादळाला तौक्ते हे नाव म्यानमार देशाने दिले आहे. सरड्याच्या एका विशिष्ठ प्रजातीवरून हे नाव देण्यात आले आहे. बोलका सरडा म्हणून या प्रजातीला ओळखले जाते.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ