शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

Tauktae Cyclone: 'तौक्ते' वादळाची तीव्रता वाढली, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 07:06 IST

कोकणाला तडाखा; रायगड, पालघर, ठाण्याला इशारा, शनिवारी रात्रीपासून मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

मुंबई/पणजी : अरबी समुद्रात उठलेले ‘तौक्ते’ चक्रीवादळ गोव्यासह कोकणपट्टीत प्रचंड धुमाकूळ घालत मोठी पडझड करून वायव्येला गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. सोमवारी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात शनिवार रात्रीपासूनच वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला असून जळगाव जिल्ह्यात झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणी ठार झाल्याची घटना घडली. ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली, तर घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

शनिवारी रात्रीपासून मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी हे चक्रीवादळ मुंबईच्या समुद्रातून गुजरातकडे वळणार असून, याचा प्रभाव लक्षात घेऊन सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांनादेखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली. 

वादळामुळे चिंचेचे झाड झोपडीवर कोसळून दोन बहिणी ठार झाल्याची घटना अंचलवाडी (जि. जळगाव) येथे रविवारी घडली. ज्योती (१६) व रोशनी बल्लू बारेला (१०) अशी त्यांची नावे आहेत. सिंधुदुर्गमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून वादळाने मुसळधार पावसासह धुमाकूळ घातला असून समुद्र खवळला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे कोसळली, तर घरांचेही नुकसान वादळाची तीव्रता वाढली, आज वळणार गुजरातकडे झाले. नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील किनारपट्टीला वादळाचा जोरदार तडाखा बसला. ताशी १२० ते १३० किलाेमीटर वेगाने वारे वाहात होते. अनेक भागातील कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. रविवारी सकाळी ६ ते साेमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला.

मुंबईसह कोकणाला धोका नाहीचक्रीवादळाचे मार्गक्रमण वायव्येच्या दिशेने होत असल्यामुळे कोकणसह मुंबई किनारपट्टीला ते धडकणार नाही. परंतु गुजरातच्या पोरबंदरसह इतर किनारी भागाला ताशी १७५ किलोमीटर वेगाने धडक देणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाचा केंद्रबिंदू हा गोवा किनारपट्टी भागातून वायव्येच्या दिशेने पुढे पोहोचला होता. त्यामुळे गोव्यातील प्रभाव ओसरत चालला होता, तर कोकणसह महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव अधिक वाढला होता.

गोव्यात झाडे उन्मळून पडली, बोटी भरकटल्या

  • ताशी १४५ ते १७० गतीने धावणाऱ्या या वादळाने झाडे उन्मळून पडली. घरांची छपरे उडाली. वीज खांब पाडून वीजपुरवठा खंडित झाला. समुद्रातील मालवाहू बार्जीही भरकटवून टाकल्या. 
  • पहाटे ४ वाजल्यापासून चक्रीवादळाचा प्रभाव वाढला होता. विशेषत: दक्षिण गोव्यात मोठी पडझड झाली. उंच लाटा किनाऱ्याला आदळून काही भागात लोकांच्या घरांपर्यंत पाणी शिरले. नंतर त्याचा प्रभाव आणखी वाढला. 
  • १०.३० च्या सुमारास पणजीपासून अवघ्या १०६ किलोमीटर अंतरावर हे चक्रीवादळ पोहोचले होते. महाराष्ट्रातून गोव्याला वीज पुरवणारी २२० केव्ही वीजवाहिनी निकामी झाली. अनेक ठिकाणी ३३ केव्ही फीडर बंद झाले त्यामुळे बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला.
टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ