शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली, मदत कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:11 IST

सिंधुदुर्गात ७० कोटी रुपयांचे नुकसान, सर्वत्र पंचनाम्याचे काम जोरात सुरू 

मनोज वारंग 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग : तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकणाला बसला आहे. त्यातही सिंधुदुर्ग आणि त्यापाठोपाठ रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली असून पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पाहणी दौरा करून मदतीपासून कुणीही वंचित राहणार नसल्याचे आश्वासन दिले असले तरी ‘निसर्ग’चा अनुभव पाहता मदत नेमकी कधी हातात पडणार याची धाकधूक नुकसानग्रस्तांना  असल्याचे चित्र दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचनामे करण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून  ७० कोटींचे नुकसान झाले आहे. ६,६५२ घरे, ३३६ गोठे, ८७ शाळा, ४६ इमारती बाधित झाल्या आहेत तर ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १७२ गावांतील १,०५९ शेतकऱ्यांचे ३३७५.१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. परंतु प्रशासनाच्या अहवालानुसार ११ कोटी ९१ लाख ९८ हजार ४३० एवढे नुकसान झाले आहे. सर्व पंचनामे होण्यासाठी आणखी १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. 

पालघरमध्ये १ लाख ३० हजार नागरिकांना झळजिल्ह्यातील ९०९ गावांतील एक लाख ३० हजार नागरिकांना झळ लागली आहे. वादळात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. ५,२१७ घरांची पडझड झाली आहे. तर ७५ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २,२६४.२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती आणि आंबा, काजू, केळी आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. ७२२ वृक्ष उन्मळून पडले असून, मच्छीमारांच्या १९ बोटी फुटल्या आहेत. ९०९ गावांतील १०९२ विद्युत पोल पडल्याने चार-पाच दिवस या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला हाेता. सध्या पालघर विद्युत विभागाने त्यातील ८०० गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला असून, १०९ गावांतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेतजून २०२० मध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील २९९ शेतकऱ्यांचे सुमारे ५ कोटी रुपयांवर नुकसान झाले होते. मात्र, आतापर्यंत केवळ २ कोटींपर्यंतच नुकसानभरपाई देण्यात आली आहे. निसर्ग वादळानंतर सलग दुसऱ्या वर्षी रायगड जिल्ह्यात १३ घरांचे पूर्णतः तर ११ हजार १४४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. १५० मासेमारी बाेटींसह १२५ मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे