शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

Tanaji Sawant : "येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल"; कार्यालयाच्या तोडफोडीवर तानाजी सावंतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 15:34 IST

Tanaji Sawant And Shivsena : तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला आहे.

मुंबई - शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसैनिकामध्ये असलेला असंतोष आज उफाळून आला आणि पहिल्यापासून पक्षात नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. एकनाथ शिंदे आणि पक्षात फूट पाडण्यात आमदार तानाजी सावंत जबाबदार असल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. यावर आता तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना इशारा दिला आहे. "एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल" असं म्हणत इशारा दिला आहे. सावंत यांनी "आमचे गटनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं" अशी फेसबुक पोस्ट केली आहे.

बालाजीनगर येथील आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी सुरुवातीला नाम फलकाला काळे फासले, त्यानंतर आमदार तानाजी सावंत गद्दार असल्याच्या घोषणा देत कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्या आणि काचांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या तोडफोडीवर, हिंसाचारावर शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) य़ांनी भीती असलीच पाहीजे असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांच्या बंडानंतर लोकांमध्ये रोष आहे, तो रोखू शकत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

"भीती असलीच पाहीजे, हा जनतेचा राग, शिवसेनेची आग"; तोडफोडीवर संजय राऊतांचं रोखठोक मत

"हा महाराष्ट्रातील जनतेचा राग आहे, महाराष्ट्रात असं चालत नाही आणि राग हा असलाच पाहिजे. ही शिवसेनेची आग आहे आणि ही आग आम्ही कधीही विझू देणार नाही. राख नाही झाली पाहिजे. अग्नी तेवत ठेवण्यासाठी जी काही समिधा लागेल, ती ओतत राहिली पाहिजे" असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच "तुम्ही आमच्या आमदारांचे अपहरण कराल, त्यांना सुरक्षा द्याल आणि आम्ही आमचा राग काढणार नाही? असं होऊ शकतं का? आम्ही नामर्द आहोत का?, आम्ही नामर्द नाही" असंही म्हटलं आहे. जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. सत्ता आणि बहुमत येत-जात असतं. ठाकरे या नावाशी खरी शिवसेना जोडलेली असल्याचं संजय राऊत म्हणाले. यासोबतच शिंदे, राणे, भुजबळ हे लोक येत राहतात आणि येत राहतील. आम्ही बाळासाहेबांचे भक्त आहोत असं कोणी म्हणत असेल तर भक्ती करा. पक्षावर कब्जा करू नका, जर कब्जा केलात तर तलवारीला उत्तर तलवारीने देऊ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण