शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

‘तमाशा श्रेष्ठच’ ... उतरती कळा लागली टीकाही तथ्यहीन : बी. के. मोमीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 6:00 AM

प्रपंच चालवण्यासाठी अनेक उद्योग व्यवसाय केले, मात्र गाणी विकली नाहीत, तशीच दिली...

ठळक मुद्देविठाबाई नारायणगावकर पुरस्कार मानकरी

- राजू इनामदार -   पुणे: शिक्षण इयत्ता नववी, वय अवघे ११ वर्षे, कवठे (ता. शिरूर) गावातील गणपती उत्सवात कार्यकर्त्यांना काही गाणी हवी होती. ती नवव्या इयत्तेतील एका मुलाने तयार करून दिली. गाणी भलतीच गाजली. गावात सतत तीच गाणी धुमधडाक्यात वाजू लागली. मग एक गाणे, दुसरे, तिसरे आणि आता वयाची ७५ वर्षे झाली तरीही अजून सुरूच आहे. इतक्या वर्षांच्या या साधनेचा आता राज्य सरकारने विठाबाई नारायणगावकर पुरस्कार देऊन सन्मान केला. लोकमान्यता तर होतीच आता राजमान्यता मिळाल्याचे समाधान आहे, या शब्दांत शाहीर बशीरभाई मोमीन उर्फ बी. के मोमीन यांनी विठाबाईंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मिळाल्यानंतर भावना व्यक्त केल्या. त्यानंतर लगेचच बशीरभाई गाणी लिहिण्यात दंग होऊन जातात. गाण्याचे त्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत. प्रपंच चालवण्यासाठी अनेक उद्योग व्यवसाय केले, मात्र गाणी विकली नाहीत, तशीच दिली. त्याची त्यांना खंत नाही तर अभिमान आहे. तमाशा कलेला उतरती कळा लागली आहे असे सगळेच कलावंत म्हणत असताना शाहीर मोमीन मात्र अशा बोलण्यात काही अर्थ नाही असे मत व्यक्त करत ते कसे बरोबर आहे ते पटवूनही सांगतात. तमाशा श्रेष्ठच आहे असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

--तमाशा आता चालत नाही, फड बंद पडत आहेत... मोमीन- तमाशा चालत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. चांगले किलहिले जात नाही म्हणून चालत नाही हे बरोबर आहे. मला आठवते पुर्वी गण, गवळण, वग असा तमाशा असायचा. उजाडले तरी रसिक वग संपल्याशिवाय उठत नाही. आता जमाना फास्ट झाला आहे. मग त्याप्रमाणे बदलायला नको का? नाटकं बदलली, चित्रपट बदलले मग तमाशानेही बदलायला हवे. जे बदलले नाहीत ते बंद पडले. ज्यांनी स्वत:त बदल घडवला ते टिकले. रघुवीर खेडकरांचा फड पाहा. सगळे कसे शिस्तबद्ध चाललेले असते. पण या बदलामुळेही मूळ तमाशा संपला असे म्हटले जाते..़? -याही टिकेत माझ्या मते काही अर्थ नाही. नाटक तरी आता पूर्वीप्रमाणे नटी, सुत्रधार असे होते का? मग तमाशाच मुळचा रहावा असा आग्रह का? बदलला म्हणजे त्यातले काय बदलले ते स्पष्टपणे सांगता आले पाहिजे. लावणी, गाणी हा तमाशाचाच प्रकार आहे. फक्त गाणी सादर होतात, पण त्या गाण्यांचा बाज तमाशाचाच असतो. काही गाणी नसतात चांगली पण सगळ्याच गाण्यांना असे लेबल लावून चालणार नाही.-तुम्ही कधीपासून गाणी लिहायला लागला. - मी गण, गवळण वगही लिहिलेत, पण गाणी जास्त लिहिली. वयाच्या ११ व्या वर्षी लेखणी हातात घेतली ती अजून खाली ठेवलेलीच नाही. किती गाणी झाली त्याची गणती नाही. दत्ता महाडिक यांनी माझी सर्वाधिक गाणी केली. भावना शब्दात पकडणे, मीटरमध्ये बसवणे, चपखल शब्दांची रचना करणे हे अवघड आहे. वगातील प्रसंगाला अनुसरून गाणी लिहावी लागतात. ती बसवावी लागतात. शब्द रोजच्या वापरातले व भावना मात्र कधीतरीच दिसणारी असे असले की ती गाणी चालतात. गुणगुणावीशी वाटतात.-कोणकोणत्या तमाशासाठी गाणी लिहिलीत.दत्ता महाडिक यांना सर्वाधिक गाणी दिली. चंद्रकांत ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर आणि अनेकजण. आता आठवतही नाही. मोमीनने लिहिलं, दत्ताने गायलं असे आमचे मैत्र होते. विरहाची, प्रेमाची, भेटीची, खाणाखुणांची अशी अनेक गाणी लिहिली. अजूनही लिहितो आहे. -हिंदी चित्रपटातील गाणी व तमाशातील गाणी यात काय फरक आहे.- तमाशातील गाण्यांसाठी निरीक्षण लागते. ग्रामीण बाज लागतो. भावना सगळीकडे सारख्याच असल्या तरीही त्या व्यक्त करण्यात शहरी ग्रामीण असा फरक असतोच. मी नेहमी निरीक्षण करत असतो. त्यातून सूचत जाते. मग लिहितो. प्रयत्नपुर्वकही लिहितो व सुचते तेही लिहितो. हिंदी गाण्यांबाबत काय बोलणार? त्यांचे सगळेच वेगळे असते. - लावण्या लिहिल्या की नाहीत?आजपण माझ्याकडे १५० लावण्या तयार आहेत. संगीतकार राम कदम यांच्याबरोबर माझा बराच उशिरा संपर्क आला. त्यांना काही गाणी लिहून हवी होती. त्यावेळी माझे नाव कोणीतरी सुचवले. मला पाहिल्यावर त्यांना वाटले हा काय लिहिणार, पण गाणी पाहिली आणि त्यांना पसंती दर्शवली. त्यानंतर आमचा दोस्ताना बराच वाढला.रातराणीचा गंध बहरला, सजण येईना, चंद्र ढळला, झोप येईना, मदन पेटवी जीवा. यात विरह शब्दात पकडला आहे. अशी लावण्याही अनेक लिहून झाल्या.पुरस्काराबद्धल काय भावना आहेत.लोकमान्यता होतीच आता राजमान्यताही मिळाली याचे समाधान आहे. मी कधीही गाणी लिहून पैसे कमावण्याचा उद्योग केला नाही. गाणी लिहून होत गेली, ती सर्वांनाच देत गेलो. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माज्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळण्यासारखीच गोष्ट आहे. 

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीत