शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

परीक्षा एप्रिलमध्ये घ्या; निकाल ‘मे’मध्ये लावा; शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 09:36 IST

राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई : राज्यातील अनेक शाळांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुरू केल्या असताना परीक्षा एप्रिलमध्ये घ्या आणि निकाल मे महिन्यात लावा, असे अजब परिपत्रक गुरूवारी शिक्षण मंडळाने जारी केले. शिक्षण विभागाचे हे वरातीमागून घोडे असल्याची टीका होत आहे. राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मे महिन्यात निकाल जाहीर करावेत, असेही निर्देशित केले आहे. राज्यात २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासन आणि महापालिकांना शालेय शिक्षण विभागाने दिले होते. त्यानंतर आता राज्यात पहिली ते नववी आणि आणि अकरावीचे वर्ग पूर्णवेळ एप्रिलअखेर सुरू ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने गुरूवारी दिल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातून प्रचंड विरोध दरवर्षी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत होऊन एप्रिल महिन्यात त्यांचे निकाल जाहीर केले जातात. यंदा शालेय शिक्षण विभागाकडून परीक्षांच्या बाबतीत काहीच सूचना न आल्याने अनेक जिल्ह्यातील शाळांनी परीक्षांना सुरुवात केली आहे. अनेक शाळांच्या तर परीक्षाही झाल्या आहेत. त्यामुळे आताच्या परिपत्रकामुळे परीक्षा सुरू न झालेल्या शाळांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यास पालकांचाही विरोध आहे.रविवारी शाळा भरवण्याची सूचनाnकोरोना काळातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शाळांनी शनिवारी पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवून ऐच्छिक स्वरूपात रविवारीही वर्ग सुरू ठेवता येतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.nएप्रिलअखेर किंवा तिसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन मे महिन्यात निकाल जाहीर करावेत, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीस शिक्षण विभागाने परवानगी दिली.