शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परीक्षा एप्रिलमध्ये घ्या; निकाल ‘मे’मध्ये लावा; शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 09:36 IST

राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई : राज्यातील अनेक शाळांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुरू केल्या असताना परीक्षा एप्रिलमध्ये घ्या आणि निकाल मे महिन्यात लावा, असे अजब परिपत्रक गुरूवारी शिक्षण मंडळाने जारी केले. शिक्षण विभागाचे हे वरातीमागून घोडे असल्याची टीका होत आहे. राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मे महिन्यात निकाल जाहीर करावेत, असेही निर्देशित केले आहे. राज्यात २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासन आणि महापालिकांना शालेय शिक्षण विभागाने दिले होते. त्यानंतर आता राज्यात पहिली ते नववी आणि आणि अकरावीचे वर्ग पूर्णवेळ एप्रिलअखेर सुरू ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने गुरूवारी दिल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातून प्रचंड विरोध दरवर्षी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत होऊन एप्रिल महिन्यात त्यांचे निकाल जाहीर केले जातात. यंदा शालेय शिक्षण विभागाकडून परीक्षांच्या बाबतीत काहीच सूचना न आल्याने अनेक जिल्ह्यातील शाळांनी परीक्षांना सुरुवात केली आहे. अनेक शाळांच्या तर परीक्षाही झाल्या आहेत. त्यामुळे आताच्या परिपत्रकामुळे परीक्षा सुरू न झालेल्या शाळांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यास पालकांचाही विरोध आहे.रविवारी शाळा भरवण्याची सूचनाnकोरोना काळातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शाळांनी शनिवारी पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवून ऐच्छिक स्वरूपात रविवारीही वर्ग सुरू ठेवता येतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.nएप्रिलअखेर किंवा तिसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन मे महिन्यात निकाल जाहीर करावेत, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीस शिक्षण विभागाने परवानगी दिली.