शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

परीक्षा एप्रिलमध्ये घ्या; निकाल ‘मे’मध्ये लावा; शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 09:36 IST

राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई : राज्यातील अनेक शाळांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुरू केल्या असताना परीक्षा एप्रिलमध्ये घ्या आणि निकाल मे महिन्यात लावा, असे अजब परिपत्रक गुरूवारी शिक्षण मंडळाने जारी केले. शिक्षण विभागाचे हे वरातीमागून घोडे असल्याची टीका होत आहे. राज्यात अनेक शाळांच्या परीक्षा संपत असून पालकांनी आपापल्या गावी जाण्याची तिकिटेही आरक्षित केली आहे. मात्र आता शिक्षण विभागाने गुरुवारी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मे महिन्यात निकाल जाहीर करावेत, असेही निर्देशित केले आहे. राज्यात २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासन आणि महापालिकांना शालेय शिक्षण विभागाने दिले होते. त्यानंतर आता राज्यात पहिली ते नववी आणि आणि अकरावीचे वर्ग पूर्णवेळ एप्रिलअखेर सुरू ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने गुरूवारी दिल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातून प्रचंड विरोध दरवर्षी पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत होऊन एप्रिल महिन्यात त्यांचे निकाल जाहीर केले जातात. यंदा शालेय शिक्षण विभागाकडून परीक्षांच्या बाबतीत काहीच सूचना न आल्याने अनेक जिल्ह्यातील शाळांनी परीक्षांना सुरुवात केली आहे. अनेक शाळांच्या तर परीक्षाही झाल्या आहेत. त्यामुळे आताच्या परिपत्रकामुळे परीक्षा सुरू न झालेल्या शाळांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यास पालकांचाही विरोध आहे.रविवारी शाळा भरवण्याची सूचनाnकोरोना काळातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शाळांनी शनिवारी पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवून ऐच्छिक स्वरूपात रविवारीही वर्ग सुरू ठेवता येतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.nएप्रिलअखेर किंवा तिसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन मे महिन्यात निकाल जाहीर करावेत, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीस शिक्षण विभागाने परवानगी दिली.