शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

राज्यात अपघातांचा ‘आलेख’ चढाच!, नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करा-परिवहन आयुक्त कार्यालयाची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 5:08 AM

देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

मुंबई : देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर वाहन तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय २०१६च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक अपघात होणाºया पाच शहरांत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. राज्यात ३९ हजार ८७८ रस्ते अपघातांमध्ये १२ हजार ९३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालय नियुक्त रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या आदेशानुसार आॅगस्ट महिन्यातील कारवाई आवश्यक त्या वेगाने झालेली नाही, अशी माहिती परिवहन कार्यालयातून देण्यात आली. यामुळे १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात वाहने आणि वाहन चालक यांची तपासणी करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत.वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हर स्पीड वाहन चालवणे यामुळे रस्ते अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अशा कारणांसह अनुज्ञप्ती (लायसन्स) वैधता, विमा प्रमाणपत्र, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न बांधणे, नियमांनुसार नंबरप्लेट नसणे, मल्टी टोन हॉर्न, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी बसणे अशा गुन्ह्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.वाहनांवर उत्पादकाने बसविलेले दिवे बदलून प्रखर दिवे बसवणा-यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात यावा; त्याचबरोबर राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहन तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत.>अपघाती मृत्यूची टॉप पाच राज्येराज्ये अपघातीमृत्यूंची संख्याउत्तर प्रदेश १९,३२०तामिळनाडू १७,२१८महाराष्ट्र १२,९३५कर्नाटक ११,१३३राजस्थान १०,४६५