शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

आदिवासी विद्यार्थ्यांवरील बलप्रयोगाचे पडसाद, पोलिसांवर कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 4:11 AM

नाशिकमधील आदिवासी मुलांनी काढलेल्या मोर्चाला अडवल्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले.

नागपूर : नाशिकमधील आदिवासी मुलांनी काढलेल्या मोर्चाला अडवल्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. यासंदर्भात विद्यार्थ्यांवर बल प्रयोग करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. विरोधकांच्या मागणीनुसार संबंधित अधिकारी आणि आदिवासी आमदारांची बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण बंद करून त्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येत आहे. याला विरोध करीत वसतिगृहात जेवण देण्याची पद्धत पूर्ववत करावी, या मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पुणे ते नाशिक मोर्चा काढला. नांदूर शिंगोटे येथे पेलिसांनी या विद्यार्थ्यांवर बल प्रयोग केला. त्यांना पाोलीस व्हॅनमध्ये डांबल्याचे सांगत पोलिसांवर कारवाई करावी. तसेच डीबीटी पद्धत ताबडतोब रद्द करून वसतिगृहातील जेवण सुरू करावे अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हा मुद्दा लावून धरला. ते विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पायी जात होते. त्यांच्यावर अशी दडपशाही का करण्यात आली.प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबतही दडपशाही करण्यात आल्याचे सांगत पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय वसतिगृहातील जेवण निकृष्ट असते. त्यामुळे ते बंद करण्याची मागणी करणारी अनेक निवेदने विद्यार्थ्यांकडून शासनाला मिळाली होती. त्यानुसार डीबीटी योजना अणण्यात आली. ती सर्वत्र लागू नाही. केवळ शहरातील आदिवासी वसगिृहातील जेवण बंद करून त्यातील पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात. त्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मुलेही राहतात. ते शिकणाºया मुलांवर दडपशाही करतात. ती मुलेही मोर्चात मोठ्या प्रमाणावर सामील होती. त्यामुळे आंदोलनात विद्यार्थी अनुचित प्रकार घडवू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्या मुलांना अडवले आणि त्यांना व्हॅनमध्ये बसवून त्यांच्या गावी सोडले होते. बल प्रयोग झाला नाही. त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही आहे. असे असले तरी या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीसंदर्भात संबंधित अधिकारी आणि आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन तोडगा कााढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Policeपोलिस