शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Sanjay Raut: तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:50 IST

तहव्वूर राणा प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणले असून त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. याच पार्श्वभूभीवर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू असल्याचे म्हटले आहे. बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी राणाला भारतात आणले गेले आहे. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात, असेही ते म्हणाले. संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

तहव्वूर राणा प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू आहे. बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणि या मुद्द्याचा निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी वापर करतील. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात,  असेही संजय राऊत म्हणाले.

सत्ताधारी पक्षाने श्रेय घेऊ नये- राऊतराणाला भारतात आणले गेले असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केले पाहिजे, त्यासाठी भाजपने श्रेय घ्यायचे कारण काय आहे? काँग्रेसच्या काळातच राणाला भारतात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे सत्ताधारी पक्षाने श्रेय घेऊ नये. राणाच्या आधी अबू सालेम यालाही अशाच प्रक्रियेतून भारतात आणण्यात आले होते, असा टोला संजय राऊतांनी अप्रत्यक्ष भाजपला लगावला. भाजपला जर राणाचे श्रेय घ्यायचे असेल तर त्यांनी पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घेतले पाहिजे, भाजपने पाकिस्तामध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधवांनाही परत आणावे, असेही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र