शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

Sanjay Raut: तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:50 IST

तहव्वूर राणा प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणले असून त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. याच पार्श्वभूभीवर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू असल्याचे म्हटले आहे. बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी राणाला भारतात आणले गेले आहे. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात, असेही ते म्हणाले. संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

तहव्वूर राणा प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू आहे. बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणि या मुद्द्याचा निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी वापर करतील. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात,  असेही संजय राऊत म्हणाले.

सत्ताधारी पक्षाने श्रेय घेऊ नये- राऊतराणाला भारतात आणले गेले असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केले पाहिजे, त्यासाठी भाजपने श्रेय घ्यायचे कारण काय आहे? काँग्रेसच्या काळातच राणाला भारतात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे सत्ताधारी पक्षाने श्रेय घेऊ नये. राणाच्या आधी अबू सालेम यालाही अशाच प्रक्रियेतून भारतात आणण्यात आले होते, असा टोला संजय राऊतांनी अप्रत्यक्ष भाजपला लगावला. भाजपला जर राणाचे श्रेय घ्यायचे असेल तर त्यांनी पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घेतले पाहिजे, भाजपने पाकिस्तामध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधवांनाही परत आणावे, असेही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र