शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सिरींजचा कचरा रस्त्यावर

By admin | Published: September 19, 2014 12:59 AM

जैविक कचऱ्यातून आजाराचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यातील वस्तू पुन्हा वापरल्या जाण्याचा धोका सर्वात जास्त असतो. म्हणून शासकीय व खासगी इस्पितळांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट

दोन लाख रुग्ण वापरतात इन्सुलिनचे इंजेक्शनसुमेध वाघमारे - नागपूरजैविक कचऱ्यातून आजाराचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यातील वस्तू पुन्हा वापरल्या जाण्याचा धोका सर्वात जास्त असतो. म्हणून शासकीय व खासगी इस्पितळांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र घराघरांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचे काय, याबाबत अद्यापही प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. शहरात सध्याच्या घडीला सुमारे दोन लाख रुग्ण इंजेक्शनमधून इन्सुलिन घेतात. यांचा दरदिवशीचा दीड लाखांच्यावर इंजेक्शन सिरींज कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. हा कचरा उचलणाऱ्यांचे आणि ते हाताळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जैविक घनकचरा आरोग्याला घातक ठरू शकतो. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याचे नियम प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिले आहेत. शहरातील बहुसंख्य इस्पितळे याचे कठोरतेने पालनही करतात. रु ग्णालयातील खाटांप्रमाणे महापालिका जैविक कचऱ्यासाठी दर आकारते. याचे कंत्राट ‘सुपर हायजेनिक’ या एजन्सीला देण्यात आले आहे. ही एजन्सी दवाखान्यांमधील जैविक, वैद्यकीय कचरा जमा करून त्याच्यावर प्रक्रि या करण्याचे काम करते. परंतु अनेक घरांमध्ये काही विविध कामानिमित्त वापरण्यात आलेले कॉटन, इंजेक्शनच्या सिरींज या थेट सामान्य कचऱ्यात टाकल्या जात आहे. यात इन्सुलिनचा वापर करणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात अधिक आहे. बदलती जीवनशैली आणि आहार यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डॉक्टरांची जबाबदारी डॉक्टर रुग्णांना इन्सुलिन घेण्यास सांगतात. त्यामुळे ही जबाबदारी डॉक्टरांची आहे. रुग्ण किती इन्सुलिन घेतो याची माहिती संबंधित डॉक्टरांकडेच असते. यामुळे डॉक्टरांनी ही खबरदारी घ्यायला हवी. सध्यातरी कचऱ्यातील इंजेक्शन टोचल्यामुळे कुठला कर्मचारी गंभीर झाल्याची घटना नाही. -डॉ. मिलिंद गणवीरउपसंचालक, आरोग्य विभाग मनपा.कचऱ्यातील सिरींजमुळे आणखी धोका वाढतोशहरात साधारण दोन लाख लोक इन्सुलिनचा वापर करतात. या रुग्णांना आपला जैविक कचरा स्वत:च हाताळावा लागतो. डॉक्टर हा कचरा आपल्याकडे जमा करण्याचा सूचना देत असले तरी अनेक रुग्णांना ते शक्य होत नाही. यामुळे घराघरांतून निघणाऱ्या कचऱ्यात हा कचरा जातो. परिणामी याचा धोका वाढतो. हेपेटायटिस बी, एचआयव्ही पुरताचा हा धोका राहत नाही तर यापेक्षाही गंभीर आजार होण्याची भीती असते.-डॉ. सुरेश अग्रवाल