शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

राज्यभरात स्वाइन फ्लूचा फास अधिक आवळतोय; 5 महिन्यात १७७ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 06:15 IST

नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे.

मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, जानेवारी ते मे या काळात १ हजार ५९२ बाधित रुग्ण आढळले आहेत. तर या कालावधीत राज्यभरात १७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. विशेष म्हणजे, थंड हवामान असलेल्या नागपूर आणि नाशिकमध्ये सर्वाधिक स्वाइन फ्लूची साथ पसरली आहे. 

नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे. सरकारी यंत्रणेकडून स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. यंदा राज्यभरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने स्वाइन फ्लू व साथीच्या आजारांना पोषक वातावरण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण नाशिक, पुणे, नागपूर व अहमदनगरमध्ये आढळून आले आहेत. विशेष म्हणजे स्वाइनची प्राथमिक लक्षणे सर्दी, खोकला, धाप लागणे, दोन-तीन दिवस ताप राहणे, घसा खवखवणे असे दिसताच तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत स्वाइन फ्लू लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या दुसºया व तिसºया तिमाहीतील गरोदर मातांसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºया व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. २०१५-१६ मध्ये १ लाख १ हजार ३५६ जणांना ही लस देण्यात आली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ अखेर ४२,४९२ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. १ जानेवारी ते ३० जून २०१८ अखेर १,२८,०२६ व्यक्तींना लसीकरण देण्यात आले आहे. यंदा १ जानेवारी ते २६ मे २०१९ या कालावधीत २ हजार ९९० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लू