शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

राज्यभरात स्वाइन फ्लूचा फास अधिक आवळतोय; 5 महिन्यात १७७ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 06:15 IST

नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे.

मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, जानेवारी ते मे या काळात १ हजार ५९२ बाधित रुग्ण आढळले आहेत. तर या कालावधीत राज्यभरात १७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. विशेष म्हणजे, थंड हवामान असलेल्या नागपूर आणि नाशिकमध्ये सर्वाधिक स्वाइन फ्लूची साथ पसरली आहे. 

नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे. सरकारी यंत्रणेकडून स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. यंदा राज्यभरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने स्वाइन फ्लू व साथीच्या आजारांना पोषक वातावरण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण नाशिक, पुणे, नागपूर व अहमदनगरमध्ये आढळून आले आहेत. विशेष म्हणजे स्वाइनची प्राथमिक लक्षणे सर्दी, खोकला, धाप लागणे, दोन-तीन दिवस ताप राहणे, घसा खवखवणे असे दिसताच तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत स्वाइन फ्लू लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या दुसºया व तिसºया तिमाहीतील गरोदर मातांसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºया व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. २०१५-१६ मध्ये १ लाख १ हजार ३५६ जणांना ही लस देण्यात आली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ अखेर ४२,४९२ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. १ जानेवारी ते ३० जून २०१८ अखेर १,२८,०२६ व्यक्तींना लसीकरण देण्यात आले आहे. यंदा १ जानेवारी ते २६ मे २०१९ या कालावधीत २ हजार ९९० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लू