शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

राज्यभरात स्वाइन फ्लूचा फास अधिक आवळतोय; 5 महिन्यात १७७ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 06:15 IST

नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे.

मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, जानेवारी ते मे या काळात १ हजार ५९२ बाधित रुग्ण आढळले आहेत. तर या कालावधीत राज्यभरात १७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. विशेष म्हणजे, थंड हवामान असलेल्या नागपूर आणि नाशिकमध्ये सर्वाधिक स्वाइन फ्लूची साथ पसरली आहे. 

नाशिकमध्ये मृत्यूचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुणे मनपामध्ये १३ तर कोल्हापूरमध्ये ९ अशी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची नोंद आहे. सरकारी यंत्रणेकडून स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. यंदा राज्यभरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने स्वाइन फ्लू व साथीच्या आजारांना पोषक वातावरण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण नाशिक, पुणे, नागपूर व अहमदनगरमध्ये आढळून आले आहेत. विशेष म्हणजे स्वाइनची प्राथमिक लक्षणे सर्दी, खोकला, धाप लागणे, दोन-तीन दिवस ताप राहणे, घसा खवखवणे असे दिसताच तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत स्वाइन फ्लू लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या दुसºया व तिसºया तिमाहीतील गरोदर मातांसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºया व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. २०१५-१६ मध्ये १ लाख १ हजार ३५६ जणांना ही लस देण्यात आली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ अखेर ४२,४९२ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. १ जानेवारी ते ३० जून २०१८ अखेर १,२८,०२६ व्यक्तींना लसीकरण देण्यात आले आहे. यंदा १ जानेवारी ते २६ मे २०१९ या कालावधीत २ हजार ९९० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लू