आवक मंदावल्याने गोड फळे झाली कडू
By Admin | Updated: June 20, 2014 22:11 IST2014-06-20T21:25:05+5:302014-06-20T22:11:02+5:30
पावसाला सुरूवात झाली असली तरी गेल्या महिनाभरात वाढलेल्या तापमानामुळे बाजारपेठेत फळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

आवक मंदावल्याने गोड फळे झाली कडू
राजेंद्र वाघ, शहाड - पावसाला सुरूवात झाली असली तरी गेल्या महिनाभरात वाढलेल्या तापमानामुळे बाजारपेठेत फळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे सध्या फळबाजार कडाडला असून फळांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वमसाान्यांसाठी गोड असणारी फळे आता कडू वाटू लागली आहेत.
उन्हाळ्यात हिमाचल प्रदेश, सिमला आदी ठिकाणाहून सफरचंद येत नाहीत. त्यामुळे सध्या तरी साठवलेला माल बाजारात विक्रीसाठी येत आहे. बाहेरील देशांमधून आयात केलेली सफरचंद तब्बल २०० रुपये किलो इतका दर आहे. हिमाचल प्रदेशातील सफरचंद १५० रुपये किला दराने मिळत आहेत. डाळींब १४० रुपये, पेर १६० रुपये व संत्रा १०० रुपये किलो दराने विकली जात आहेत. शिवाय स्ट्रॉबेरी, मोसंबी व खरबूज ही फळेदेखील बाजारात उपलब्ध असली तरी ते सुद्धा ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जात आहेत.
सर्वच फळांच्या किंमती शंभर रुपयांच्या आसपास गेल्याने सर्वसामान्यांना फळांचा गोडवा चाखणे कठीण झाले आहे. याशिवाय फळबाजारावर अवलंबून असलेले विविध प्रक्रिया उद्योगांवरही या दरवाढीचा परिणाम झाला आहे. व्यापारी व किरकोळ विक्रेते सुद्धा बाजारातील तेजी-मंदी अर्थात परिस्थिती पाहून माल उचलतात. सध्या बाजारात मागणी जास्त असली तरी फळांची आवक कमी असल्याने फळांचे दर गगणानाल भिडले आहेत.
ज्युस मिळणे झाले कठीण
फळांचे दर गगनाला भिडल्याने त्याचा परिणाम ज्यूस विक्रीवर झाला आहे. सध्या कल्याण , डोंबिवली व आसपासच्या परिसरात ३० ते ३५ रुपये प्रतिग्लास ज्यूस बाजारात मिळत आहे. ज्युसचे दर वाढल्याने ज्यूस पिण्याकडे असलेला नागरिकांचा कल कमी झाला आहे.
असे आहेत दर
२०० रूपये - सफरचंद
२०० रुपये - जरदाळू
१६० रुपये - पेर
१४० रुपये - डाळींब
१०० रुपये -संत्रा
५० रुपये - खरबूज
६० रुपये - मोसंबी
६० रुपये - स्ट्रॉबेरी
६० रुपये - आंबा
४० रुपये - केळी (डझन)
वरील दर प्रति एका किलोचे
'सध्या वातावरण अत्यंत प्रतिकूल असल्याने बाजारात फळाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे फळांचे दरही वाढले आहेत. परंतु आता पावसाला सुरूवात झाली असून येत्या महिनाभरात फळांची आवक वाढून दर सुद्धा कमी होती'- विनोद मौर्या, फळविक्रेता, कल्याण