शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'स्वराज्य' पक्ष विधानसभेला उमेदवार उतरणार; संभाजीराजे अन् मनोज जरांगे युती करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 17:53 IST

मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टला निवडणुकीत उमेदवार उतरवायचे की नाही हे ठरवणार आहे. तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. 

सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होईलं असं बोललं जातं. परंतु विधानसभेला तिसरी आघाडीही समोर येण्याची शक्यता आहे. त्यात कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडूनही विधानसभेची तयारी करण्यात आली आहे. स्वराज्य संघटना विधानसभेला उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. 

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मनोज जरांगेंसोबत अद्याप चर्चा झाली नाही परंतु ही चर्चा होणार आहे. त्यांचा दृष्टीकोन आणि माझे उद्दिष्टे हे एकच आहे. आमचे पंजोबा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीच पहिले आरक्षण दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते घटनेत अंमलात आणले. मनोज जरांगे पाटलांना नेहमीच माझा पाठिंबा राहिलेला आहे. त्यांच्याशी लवकरच राजकीय चर्चाही होईल असं त्यांनी स्पष्ट केले. 

तसेच मराठा-ओबीसी वाद होऊ नये या मताचा मी आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला आहे. आता सगळ्यांनी एकत्र बसणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना अठरापगड, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन केली. शाहू महाराजांनी जे आरक्षण दिले त्यात अनुसुचित जाती-जमाती, मराठ्यांचाही त्यात समावेश होता. सगळ्या जातीतील लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे. ते कसं बसवायचे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक पक्षांनी आपली भूमिका घेतली आहे. ते आरक्षण टिकणार का हेसुद्धा महत्त्वाचे आहे. मी त्यावर सविस्तर बोलणार आहे.मराठा-ओबीसी समाजातील लोकांनी एकत्रित बसायला हवं. यात गरिब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे असंही संभाजीराजे यांनी म्हटलं. 

दरम्यान, आमचे उमेदवार विधानसभेला उभे राहतील. किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेले नाही. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत. महायुती-महाविकास आघाडीसोबत जाण्याचा आमचा संबंध येत नाही. तिसऱ्या आघाडीचा पर्यायही नाकारता येत नाही. आज माझ्यासोबत राजरत्न आंबेडकर आहेत. हा पहिला टप्पा आहे. सुरुवात झालेली आहे. पर्याय खुले आहेत असंही संभाजीराजे यांनी सांगितले. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४