शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई देशात तिसऱ्या स्थानी; नाशिक ११ व्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 13:32 IST

गेल्या वर्षी सातव्या स्थानी असलेल्या नवी मुंबईची तिसऱ्या क्रमांकावर उडी

नवी मुंबई/नाशिक: केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात सातव्या क्रमांकावर होतं. मात्र यंदा शहरानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर पहिल्या १० शहरांमध्ये येण्यासाठी विविध उपाययोजना राबवणाऱ्या नाशिक महापालिकेला ११ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. नाशिक महापालिका राज्यात नवी मुंबईनंतर दुसऱ्या स्थानी आहे.केंद्र सरकारनं स्वच्छ शहर सर्वेक्षण योजना सुरू केल्यानंतर नाशिक महापालिकेनं सातत्यानं टॉप टेनमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलं नव्हतं. गेली दोन वर्षे नाशिक ६४ आणि ६७ व्या क्रमांकावर होतं. त्यामुळे पालिका प्रशासनाचा भ्रमनिरास झाला होता. गेल्या वर्षी केंद्र शासनानं निकषात बदल केले आणि त्रैमासिक मूल्यमापन सुरू झालं. त्यात दोन वेळा नाशिकचा क्रमांक पहिल्या टॉप टेनमध्ये असल्यामुळे महापालिकेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारनं स्टार मानांकन जाहीर केलं. त्यात नाशिक महापालिकेला केवळ सिंगल स्टार मिळाल्यामुळे प्रशासनाचा भ्रमनिरास झाला होता. नाशिकच्या तुलनेत धुळे आणि जळगाव छोटी शहरे असतानादेखील त्यांना थ्री स्टार मानांकन मिळाल्यामुळे महापालिकेने आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता केंद्र सरकारनं त्याचीही दखल या निकालात घेतली असून नाशिक महापालिकेला अकरावा क्रमांक जाहीर केला आहे. राज्यात नाशिक महापालिका दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती महापालिका आयुक्त  राधाकृष्ण गमे यांनी दिली. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका