शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई देशात तिसऱ्या स्थानी; नाशिक ११ व्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 13:32 IST

गेल्या वर्षी सातव्या स्थानी असलेल्या नवी मुंबईची तिसऱ्या क्रमांकावर उडी

नवी मुंबई/नाशिक: केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात सातव्या क्रमांकावर होतं. मात्र यंदा शहरानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर पहिल्या १० शहरांमध्ये येण्यासाठी विविध उपाययोजना राबवणाऱ्या नाशिक महापालिकेला ११ व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. नाशिक महापालिका राज्यात नवी मुंबईनंतर दुसऱ्या स्थानी आहे.केंद्र सरकारनं स्वच्छ शहर सर्वेक्षण योजना सुरू केल्यानंतर नाशिक महापालिकेनं सातत्यानं टॉप टेनमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलं नव्हतं. गेली दोन वर्षे नाशिक ६४ आणि ६७ व्या क्रमांकावर होतं. त्यामुळे पालिका प्रशासनाचा भ्रमनिरास झाला होता. गेल्या वर्षी केंद्र शासनानं निकषात बदल केले आणि त्रैमासिक मूल्यमापन सुरू झालं. त्यात दोन वेळा नाशिकचा क्रमांक पहिल्या टॉप टेनमध्ये असल्यामुळे महापालिकेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारनं स्टार मानांकन जाहीर केलं. त्यात नाशिक महापालिकेला केवळ सिंगल स्टार मिळाल्यामुळे प्रशासनाचा भ्रमनिरास झाला होता. नाशिकच्या तुलनेत धुळे आणि जळगाव छोटी शहरे असतानादेखील त्यांना थ्री स्टार मानांकन मिळाल्यामुळे महापालिकेने आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता केंद्र सरकारनं त्याचीही दखल या निकालात घेतली असून नाशिक महापालिकेला अकरावा क्रमांक जाहीर केला आहे. राज्यात नाशिक महापालिका दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती महापालिका आयुक्त  राधाकृष्ण गमे यांनी दिली. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका