शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

‘स्वाभिमानी’चा आज पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:17 IST

थकीत एफआरपीचा प्रश्न; खासदार राजु शेट्टी करणार नेतृत्व

कोल्हापूर : थकीत एफआरपीपोटी साखर कारखान्यांकडील साखर विक्री करून, शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. या मागणीसाठी आज, सोमवारी सकाळी ११ वाजता खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. साखर जप्तीचे आदेश काढल्याशिवाय न हलण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे.राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे केल्याने हजारो कोटींची एफआरपी थकीत आहे. उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांत शेतकºयांना एफआरपीप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे; पण कारखान्यांनी कायद्याचे तुकडे केल्याचा आरोप ‘स्वाभिमानी’चा आहे. कारखानदार खुशाल कायदा मोडत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.कारखान्यांना आमचे पैसे देता येत नसतील, तर कायद्यातील तरतुदीनुसार साखर आयुक्तांनी साखर जप्त करावी, त्याची विक्री करून शेतकºयांना प्राधान्याने पैसे द्यावेत. या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी’चे राज्यातील कार्यकर्ते पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर धडक देणार आहेत.गत हंगामातील २७० कोटी थकीतराज्यातील अनेक कारखान्यांकडे २७० कोटींची गेल्या हंगामातील एफआरपी थकीत आहे. विशेष म्हणजे या कारखान्यांकडे एक किलोही साखर शिल्लक नसल्याने थकीत एफआरपीचा पेच आहे.मागील अनुभव पाहता उर्वरित एफआरपी मिळण्याची खात्री नाही. गेल्या हंगामातील एफआरपी थकीत आहे; पण त्यांच्याकडे एक किलोही साखर शिल्लक नाही, आता पैसे कसे वसूल करायचे. साखर विक्री करून पहिले शेतकºयांचे पैसे द्यावे, यासाठी ही लढाई आहे.- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने