शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

विदर्भातही दुधप्रश्नी स्वाभिमानीचे आंदोलन; मध्यरात्रीपासून प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 4:23 PM

दूध अनुदानप्रश्नी विदर्भातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असून पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

बुलडाणा : दूध अनुदानप्रश्नी विदर्भातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असून पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. दरम्यान, गनिमीकाव्याने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी ‘लोकमत’शीबोलताना दिले.दुसरीकडे शेतकरी कर्जमुक्तीसाठी गेल्यावर्षी पुकारलेल्या संपादरम्यान काही मंत्र्यांना हाताशी धरून शासनाने शेतकर्यांच्या आंदोलनात फुट पाटण्याचा प्रयत्न केला होता तीच पद्धत दुध आंदोलनप्रश्नी वापरण्यात येत असल्याचे  तुपकर यांचे म्हणणे आहे.प्रती लिटर पाच रुपयाप्रमाणे दुधाचे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा करावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभीमानीने १६ जुलै पासून मुंबईचे दूध तोडण्याचा इशारा दिला आहे. मध्यरात्रीपासून हे आंदोलन करण्यात येणार आहे.पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश सोबतच विदर्भातही या आंदोलनाची धार वाढविण्यात येणार असल्याचे तुपकर म्हणाले. दरम्यान, त्यानुषंगाने स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांच्या बैठकाही झाल्या असून हे आंदोलन गनिमी काव्याने करण्यात येणार आहे. बुलडाण्याचे कुलदैवत जगंदबा देवीला दुग्धाभिषेक करून या आंदोलनास प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे.दुसरीकडे दुधप्रश्नी स्वाभिमानी आक्रमक झाल्यानंतर काही संघांनी तथा शासनाने तीन रुपये वाढ करण्याची भाषा वापरून आंदोलनात फुट पाडण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप तुपकरांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना या प्रश्नी आक्रमक झाल्यानंतर दूध संघ आणि शासनाला तीन रुपये वाढ करण्याचे कसे सुचले असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी जोपर्यंत मागणी पूर्ण होणारनाही, तोपर्यंत मागे हटण्याचा प्रश्न नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, स्वाभिमानीचे पदाधिकारी राणा चंदन यांनी बुलडाणा जिल्ह्यातही आंदोलन होणार असल्याचे संकेत दिले. मात्र आंदोलनाचे नेमके स्वरुप काय असेल याबाबत त्यांनी माहिती मात्र दिली नाही.

सरकारला आंदोलनाला हिंसक वळण लावायचे?पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तो यशस्वी होणार नाही. आंदोलनात कर्जमुक्तीच्या आंदोलनाप्रमाणे काही मंत्र्यांना हाताशी धरून फुट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तो कदापीही यशस्वी होणार नाही, असे ही तुपकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :milkदूधbuldhanaबुलडाणा